हृदयद्रावक! नांदेडमध्ये पाण्यात बुडून चार लहान मुलांचा मृत्यू…
नांदेड : नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरात असलेल्या एका नाल्यातील पाण्यात बुडून चार लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मृत मुलांचे वय ७ ते १० वर्षांच्या दरम्यान असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. देगलूर नाका भागात खोदकामासाठी करण्यात आलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले […]
अधिक वाचा...गुहागरच्या समुद्रात कुटुंबातील तिघे बुडाले; एकाचा मृत्यू…
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये पर्यटनासाठी गेलेले एक कुटुंब समुद्रात बुडाल्याची घटना आज (शनिवार) दुपारी घडली. स्थानिक जीवरक्षकांनी तत्काळ तत्परता दाखवत दोघांचे प्राण वाचवले पण या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अमोल मुथ्या (वय ४२) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. अमोल मुथ्या हे कुटुंबासह कोकणात फिरण्यासाठी आले. कुटुंबासोबतची ही ट्रीप त्यांच्या आयुष्यातील शेवटची […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! मेंढीला वाचवण्यासाठी सुरेखा पुढे झाली अन् भाऊही पळत आला…
अहिल्यानगर: कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जुन्या खाणीतील खोल पाण्यात बुडून सख्ख्या भाऊ–बहिणीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. सार्थक गणपत बडे आणि सुरेखा गणपत बडे (दोघेही, रा. डाऊच खुर्द) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरासह कोपरगाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे. डाऊच खुर्द येथील गणपत बडे यांचा मेंढीपालनाचा व्यवसाय आहे. शनिवारी […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! आईची दोन्ही चिमुकल्यांना घेऊन मारली विहिरीत उडी…
धुळे : आईने आपल्या दोन 3 आणि 6 वर्षांच्या मुलांसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना निकुंभे शिवारात शनिवारी दुपारी (ता. १५) घडली आहे. गायत्री आनंदा वाघ-पाटील (वय 27 ), मुलगा दुर्गेश (वय 6) आणि मुलगी दुर्वा (वय 3) अशी मृतांची नावे आहेत. कौटुंबिक वादांमुळे नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहिती पुढे आली […]
अधिक वाचा...बीड! पोलिस अधिकाऱ्यांनी रात्रीच्या काळोखात जीव धोक्यात घालून वाचवले तीन युवकांचे प्राण…
बीड : पोलिस अधिकाऱ्यांनी रात्रीच्या काळोखामध्ये आपला जीव धोक्यात घालून तीन युवकांचे प्राण वाचवले आहेत. पोलिस उपविभागीय अधिकारी ऋषिकेश शिंदे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक गोरक्षनाथ दहिफळे यांचे परिसरातून कौतुक होत आहे. परळी तालुक्यातील कौडगाव हुडा-कासारवाडी रस्त्यावरील नदी प्रवाहात एक कार वाहून गेल्याने चार युवक मध्यरात्री पुरात अडकले होते. याबाबतची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी ऋषिकेश शिंदे […]
अधिक वाचा...धक्कादायक! धुळ्यातील जोडप्याने कोकणातील नदीत घेतली उडी…
रत्नागिरी: धुळे जिल्ह्यातील एक जोडपे कोकणात पर्यटनासाठी आल्यानंतर त्यांनी येथील चिपळूण येथील विशिष्ठी नदीत उडी घेत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि आपत्ती बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. चिपळूणमधील वाशिष्ठी नदीत दोघांनी उड्या टाकून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. युवती बुडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! ‘साई’ नावाच्या तिन मित्रांनी घेतला एकाच वेळी जगाचा निरोप…
नाशिक: नाशिकच्या बिडी कामगार नगर रस्त्यावर तीन लहान मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. सुट्टीच्या दिवशी तिन्ही मित्र एका मित्राच्या शेतात गोठ्यावर फिरायला गेले होते. परत येत असताना बांधकाम साईटवर खोदलेल्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाला. विशेष म्हणजे मृत पावलेल्या तिघा मित्रांचे नाव साई आहे. साई हिलाल जाधव (वय १४), साई केदारनाथ उगले (वय १४) आणि […]
अधिक वाचा...इंद्रायणी नदीवरील पूल अपघातातील जखमी आणि मृतांची नावे पाहा…
पुणे : पुणे जिल्ह्यातील तळेगाव जवळ असलेल्या इंद्रायणी नदीवरील पूल रविवारी (ता. १५) दुपारी कोसळून झालेल्या घटनेतील मृतांची व जखमींची नावे समोर आली आहेत. जिल्हा प्रशासनाने याबाबत माहिती दिली आहेत. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवर आजुबाजूच्या गावांना जोडणारा 30 वर्ष जुना लोखंडी पूल रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या […]
अधिक वाचा...नागपूर! एकाच कुटुंबातील 5 जणांचे पाण्यात आढळले मृतदेह…
नागपूर: नागपूरमधील कुही तालुक्यातील सुरगाव शिवारात एकाच कुटुंबातील पाच जणांचा खानीमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील हे मृतदेह असल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्या आहे की दुर्घटना आहे, या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुही पोलीस ठाण्यांतर्गत पाचगाव पोलीस चौकी समोरील भागात गर्ग खानीमध्ये ही घटना घडली आहे. आज […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! विहिरीत बुडून सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू…
लातूर: एका विहिरी जवळ खेळत असताना अचानक विहिरीत पडल्यानंतर पाण्यात बुडून सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना भुईकोट किल्ल्याजवळील ताले बुरहान (ता. औसा, जि. लातूर) परिसरात घडली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अलीना समीर शेख (वय 5) आणि उस्मान समीर शेख (वय 3) अशी मृ्त्युमुखी पडलेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. एकाच कुटुंबातील दोन […]
अधिक वाचा...
