महिला पोलिस कॉन्स्टेबलवर सलग 8 वर्ष सामूहिक बलात्कार…

जयपूर (राजस्थान): महिला पोलिस कॉन्स्टेबलवर सलग 8 वर्ष सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. पोलिस अधिकाऱ्यासह इतर पोलिस कर्मचाऱ्यांचे घाणेरडे कृत्य अत्यंत धक्कादायक पद्धतीने उघडकीस आले आहे. राजस्थानमधील चुरु जिल्ह्यातील एका पोलिस ठाण्यात तैनात असलेल्या एका महिला कॉन्स्टेबलने तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यासह चार पोलिस अधिकाऱ्यांवर सामूहिक बलात्काराचे गंभीर आरोप केले आहेत. पीडित महिलेचा […]

अधिक वाचा...

धक्कादायक! नवऱ्याचे गुप्तांग दाबून संपवलं अन् सकाळी उठल्यानंतर…

हरियाणा: सोनीपत येथील एका विवाह पॅलेसमध्ये कार्यरत असलेल्या केअरटेकर राम किशन यांच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पत्नी सरिता हिनेच पतीचे गुप्तांग दाबून हत्या केल्याचा आरोप असून, या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा पोलीस तपास सुरू आहे. सरिताने सोमवारी रात्री पतीकडे ३ हजार रुपयांची मागणी केली होती. राम किशनने नकार दिल्याने दोघांमध्ये […]

अधिक वाचा...

राजधानीत अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये होतेय वाढ…

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दररोज शेकडो प्रकरणांमध्ये मुली घरातून पळून जाणे, गायब होणे किंवा अपहरण झाल्याच्या तक्रारी नोंदवल्या जात आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रांच अंतर्गत अँटी ह्यूमन ट्रॅफिकिंग युनिट (AHTU) कार्यरत आहे. मात्र अलीकडच्या काळात समोर येणाऱ्या घटनांनी पोलिसांनाही धक्का बसला […]

अधिक वाचा...

खासगी बसला आग लागून 17 जणांचा होरपळून मृत्यू…

चित्रदुर्ग (कर्नाटक): राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर हिरियुर तालुक्यातील गोरलट्टू गावाजवळ आज (गुरुवार) पहाटेच्या सुमारास एका बसला आग लागून 17 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जखमींमधील काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. खासगी बस बेंगळुरूहून गोकर्णाकडे जात असताना विरुद्ध दिशेनं येणारी एक लॉरी डिव्हायडर ओलांडून दुसऱ्या लेनमध्ये घुसली. […]

अधिक वाचा...

पत्नीला नको त्या अवस्थेत पकडले अन् तिचे दोन प्रियकर आले…

लखनौ (उत्तर प्रदेश): पत्नीला नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर पत्नीने दोन प्रियकरांसह तिच्या व्यावसायिक पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना चांदौसी पोलिस स्टेशन परिसरात घडली आहे. पोलिसांनी पत्नी रुबी आणि तिचा प्रियकर गौरव यांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी मिक्सरने मृतदेहाचे तुकडे केले. मृताचे धड आणि कापलेला हात त्यांच्या घरापासून 800 मीटर […]

अधिक वाचा...

नवऱ्याची क्रूरपणे हत्या करणारीने दिला कारागृहात मुलीला जन्म अन् इच्छा प्रियकराला…

लखनौ (उत्तर प्रदेश): मेरठमध्ये घडलेल्या सौरभ हत्याकांडात मुख्य आरोपी ठरलेल्या मुस्कानने आपल्या नवजात मुलीचा चेहरा प्रियकरला दाखवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासाठी तिने कारागृह प्रशासनाकडे विशेष परवानगीची विनंती केली होती; मात्र तुरुंग नियमांनुसार अशा प्रकारची प्रत्यक्ष भेट घेण्याची तरतूद नसल्याने प्रशासनाने तिचा प्रस्ताव फेटाळून लावला. सौरभची पत्नी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल या दोघांनी इंदिरानगर […]

अधिक वाचा...

प्रियकराच्या मदतीनं नवऱ्याला दिलं विष दिलं अन् कुत्रं भुकू नये म्हणून…

चंदीगड (पंजाब): फरीदकोटमधील सुखनवाला गावात रुपिंदर या महिलेने तिच्या प्रियकराच्या संगनमताने तिचा पती गुरविंदर सिंगची हत्या केली. पण, पोलिसांनी अवघ्या चार तासांत तिला अटक केली. दोन दिवसांनंतर, प्रियकर न्यायालयात शरण आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. परदेशातून परतलेल्या रुपिंदर कौरने हत्येनंतर पकडले जाऊ नये म्हणून घरी सीसीटीव्ही कॅमेरेही लावले नव्हते. हत्येच्या रात्री रुपिंदरने पती […]

अधिक वाचा...

पोलिस आत्महत्या! प्रेमाचे दोन शब्द कधी तरी बोलली असती, तर..

लखनौ (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेश पोलिस दलातील कॉन्स्टेबल महेंद्र यांच्या आत्महत्येमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. 2 डिसेंबर रोजी त्यांनी कल्याणपूर परिसरातील (कानपूर) भाड्याच्या घरात गळफास घेतला. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या हृदयद्रावक चिठ्ठीमुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. “काहीतरी कमी पडलं असेल त्यामुळे मी हे जग सोडून जात आहे, माझ्या प्रिये (पत्नीला उद्देशून. प्रेमाचे दोन शब्द […]

अधिक वाचा...

प्रेमविवाह केलेल्या IAS अधिकाऱ्याच्या गर्भवती मुलीने संपवलं आयुष्य…

ताडेपल्ली (आंध्र प्रदेश) : प्रेमविवाह केलेल्या आणि हुंड्यासाठी सातत्याने छळ होत असलेल्या IAS अधिकाऱ्याच्या मुलीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुंटूर जिल्ह्यात घडली आहे. माधुरी साहित्यीबाई (वय २५) असे तिचे नाव आहे. नांद्याल जिल्ह्यातील बुग्गनपल्ली येथील राजेश नायडू सोबत ५ मार्च रोजी तिने विवाह केला होता. प्रेमविवाहानंतर काही दिवसांमध्येच तिने तिच्या पतीवर हुंड्यासाठी […]

अधिक वाचा...

मुंबईच्या नवरदेवाच्या मानेत लग्न सुरु असतानाच बिहारमध्ये घातली गोळी…

पाटणा (बिहार): लग्न सोहळा सुरु असतानाच नवरदेवाच्या गळ्यात गोळी घालून ठार केल्याची भयंकर घटना घडली. मृत नवरदेव मुंबईत टेलर होता. तो लग्नासाठी बिहारमधील खगरियामध्ये गेला होता. मोहम्मद इर्शाद असे नवरेदवाचे नाव आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. इर्शादच्या भावाने सांगितले, विवाहसोहळ्यादरम्यान एक मुलगा आला आणि नवरदेवाच्या शेजारी असलेल्या खुर्चीवर बसला. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!