सांगलीचे सुपुत्र लेफ्टनंट अथर्व कुंभार यांना प्रशिक्षणादरम्यान वीरमरण…
सांगली : सांगली जिल्ह्याच्या पलूस गावचे सुपुत्र लेफ्टनंट अथर्व संभाजी कुंभार (वय २६) यांची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट या महत्त्वाच्या पदावर निवड झाली होती. परंतु, प्रशिक्षणादरम्यान 20 किमी रनिंगचा अंतिम टप्पा पूर्ण करत असताना त्यांचे आकस्मिक दुःखद निधन झाले. आयटी कंपनीतील नोकरी सोडून ते सैन्य दलात भरती झाले होते. लेफ्टनंट अथर्व कुंभार हे सैन्य दलात […]
अधिक वाचा...महाराष्ट्र पोलिस दलात खांदेपालट; २२ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या…
मुंबई: महाराष्ट्र पोलिस दलात मोठी खांदेपालट झाली असून, पोलिस उपआयुक्त दर्जाच्या २२ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. पुणे, मुंबईसह इतर जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पुण्याच्या गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त गणेश इंगळे यांची पदोन्नती झाली आहे. गणेश इंगळे यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स याठिकाणी पोलिस उपायुक्त म्हणून पदोन्नती झाली. तर विजय […]
अधिक वाचा...महाराष्ट्राच्या सुपूत्राला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण; दीड वर्षाचा मुलगा…
अहिल्यानगर: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय लष्करातील संदिप पांडुरंग गायकर या जवानाला वीरमरण आले आहे. संदिप गायकर हे अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा गावचे भूमिपुत्र होते. या घटनेने ब्राम्हणवाडा गावासह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. गावातील ज्या सह्याद्री विद्यालयात संदिप यांनी शिक्षण घेतले त्याच विद्यालयाच्या प्रांगणात उद्या त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. संदीप यांच्या निधनानंतर […]
अधिक वाचा...शिर्डीच्या देवदर्शनासाठी जात असलेल्या भाविकांवर काळाचा घाला..
पुणेः राज्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी भीषण रस्ते अपघात झाला आहे. शिर्डी, नांदुरा आणि करमाळ्याजवळ झालेल्या या तीन वेगवेगळ्या अपघातात एकूण ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनांमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पहिली घटना… हैदराबादहून शिर्डीला देवदर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या कारला अपघात झाला. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील बारसवाडा फाट्याजवळ मध्यरात्री […]
अधिक वाचा...महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती पाकिस्तानी? पाहा आकडेवारी…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे बोलले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निष्पाप भारतीयांचे बळी घेणाऱ्या अतिरेक्यांना गाडण्याचा इशारा दिला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्वाचे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारने दिलेली मुदत संपुष्टात आल्यानंतर एकही पाकिस्तानी […]
अधिक वाचा...कोल्हापूरमध्ये प्रशांत कोरटकर याच्यावर कोर्टात वकिलानेच केला हल्ला…
कोल्हापूर : कोल्हापूर सत्र न्यायालयात मोठ्या पोलिस बंदोबस्तात सुनावणीसाठी आलेल्या प्रशांत कोरटकर हल्ला झाला आहे. न्यायालयीन परिसरातच वकिलानेच प्रशांत कोरटकरला पोलिस बंदोबस्तात असताना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून, पोलिसांनी वेळीच वकिलांना आवरल्याने मोठा अनर्थ टळला. कोर्टामध्ये युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर वकील अमित कुमार भोसले यांनी प्रशांत कोरटकरवर हल्ला करण्याचा प्रयत्न […]
अधिक वाचा...राज्यातील वाहनांच्या HSRP नंबर प्लेटबाबत महत्त्वाची बातमी…
मुंबई: राज्यातील जुन्या वाहनांसाठी उच्च सुरक्षा क्रमांक प्लेट (HSRP) बसवण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी परिवहन आयुक्तालयाने मोठा निर्णय घेतला आहे. जर एखाद्या सोसायटी किंवा इमारतीतील २५ पेक्षा जास्त वाहनधारकांनी एकत्रित नोंदणी केली, तर अधिकृत एजन्सी त्या सोसायटीत जाऊन थेट HSRP बसवणार आहे. विशेष म्हणजे, अशा प्रकरणांमध्ये वाहनधारकांकडून फिटमेंट शुल्क आकारले जाणार नाही. २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी […]
अधिक वाचा...कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाचा मोठा दिलासा…
नाशिक : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला स्थगिती दिली असून, न्यायमूर्ती नितीन जीवने यांनी निकाल दिला आहे. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांचे जावई वकील आशुतोष राठोड यांनी घेतलेला आक्षेपही फेटाळला आहे. माणिकराव कोकाटे यांची आमदारकीला कोणताही […]
अधिक वाचा...राज्यातील काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा गृहमंत्रालयाने घेतला मोठा निर्णय…
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक सरताच आणि निवडणूक निकाल लागताच गृह विभागाने मोठा निर्णय घेतलेला आहे. ज्यांच्या जीवाला धोका नाही, अशा नेत्यांच्या सुरक्षतेत कपात करण्याचे गृह विभागाने ठरवले आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गृहमंत्रालयाने घेतलेला आहे. व्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेचा आढावा घेतल्यावर गृह विभागाने निर्णय घेतल्याची माहिती पुढे आली […]
अधिक वाचा...पोलिस भरती! सरकार 10 हजार पदांची करणार भरती…
मुंबई : राज्यातील वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारीचे प्रमाण पाहता राज्य सरकार मोठ्या प्रमाणात पोलिस भरती करण्याच्या विचारात आहेत. गुन्हेगारीचा तपास करणे आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सरकार 10 हजार पदांची भरती करणार आहे. राज्यात फेब्रुवारीनंतर पोलिस भरतीची घोषणा होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. प्रशिक्षण आणि खास पथके विभागाच्या अपर पोलिस महासंचालकांनी राज्यातील सर्व शहर पोलिस […]
अधिक वाचा...