हैदराबादजवळ बस ट्रकला धडकल्याने ६ ठार १२ गंभीर जखमी
हैदराबादः तेलंगण राज्य परिवहनाची एक इलेक्ट्रिक बस हैदराबादहून विजयवाडामार्गे एलुरुकडे जात असताना, आज (बुधवारी) पहाटे सूर्यपेटजवळील कोडड येथे एका कंटेनर ट्रकला धडकून झालेल्या भीषण अपघातात, सहा प्रवासी मृत्यूमुखी पडले, तर १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असून, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. […]
अधिक वाचा...शिरूरमध्ये धावत्या ट्रकचा थरार, वाहनांना उडवत घरावर आदळला…
शिरूरः शिरूरहून राजगुरुनगरच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने एक कार आणि दोन दुचाकींना धडक दिली. अपघात घडताच घाबरलेल्या ट्रकचालकाने धावत्या ट्रकमधून उडी मारली आणि पळून गेला. चालकविरहित ट्रक ताबा नसल्यामुळे सरळ एका स्थानिक नागरिकाच्या घरावर जाऊन आदळला. अवघ्या काही क्षणांत घडलेल्य या विचित्र घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले, की […]
अधिक वाचा...पोलिस मुख्यालयात जाताना अपघातात महिला पोलिसाचा मृत्यू…
चंद्रपूर : चंद्रपूर-मूल मार्गावर दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात विशाखा बनसोड या महिला पोलिस शिपायाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पोलिस कर्मचारी वर्तुळात शोककळा पसरली आहे. तर बनसोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल मार्गावरच्या वलनी- बोर्डा वळणावर ही दोन कारची समोरासमोर धडक झाली […]
अधिक वाचा...स्वातंत्र्यदिनाच्या भीषण अपघातात तीन विद्यार्थिनींचा मृत्यू…
वर्धा : स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हिंगणघाट शहरातील आंबेडकर शाळेजवळ ट्रॅव्हल्सने दुचाकीला पाठी मागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील तीन शाळकरी मुलींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण हिंगणघाट शहरात हळहळ व्यक्त होत असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आज (शनिवार) 15 ऑगस्ट रोजी तिन्ही विद्यार्थिनी दुचाकीवरून जात होत्या. याचवेळी आंबेडकर शाळेजवळ त्यांच्या दुचाकीला […]
अधिक वाचा...नाशिक! नवविवाहित दाम्पत्याचा अंत्यविधीसाठी जात असताना अपघाती मृत्यू…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील पिळकोस फाट्यावर रविवारी (ता. २६) मोटार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात नवविवाहित दाम्पत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एक युवती गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. दिनेश गावित आणि त्यांची पत्नी कीर्ती गावित हे दोघे त्रिशा गावित हिच्यासह दुचाकीवरून प्रतापपूर येथे एका नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी जात होते. पिळकोस […]
अधिक वाचा...समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात चार जणांचा होरपळून मृत्यू; मृतांमध्ये…
वर्धा: समृद्धी महामार्गावरील वर्ध्याच्या विरुळ जवळ रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला असून यात चार जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. दुसऱ्या वाहनातील एक ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. मालवाहू वाहनाने कारला मागून जोरदार धडक दिल्याने हि भीषण अपघाताची घटना घडली. धडकेनंतर कारने […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! माहेरी जाताना नववधूचा भीषण अपघातात मृत्यू…
जळगाव : लग्नानंतर माहेरी जाण्यासाठी काकांसोबत दुचाकीवरून निघालेल्या नवविवाहिता वैशाली भाऊसाहेब पाटील (वय २१) यांचा कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठासमोरील रस्त्यावर भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला तर त्यांचे काका रावसाहेब पाटील गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वैशाली पाटील यांचा विवाह 7 जुलै रोजी जळगावातील गुजराल पेट्रोल पंप परिसरातील […]
अधिक वाचा...जेजुरीत ज्ञानोबा माऊलींच्या पालखीत ट्रक घुसला; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू…
जेजुरी: पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळ असलेल्या भोंगळे मळा परिसरात वारकऱ्यांच्या दिंडीत एक भरधाव ट्रक घुसला. यावेळी झालेल्या अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू तर तीन गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे आषाढी वारीत एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ट्रकने वारकऱ्यांना उडवले तो ट्रक वारकऱ्यांचे सामान वाहून नेणारा होता. […]
अधिक वाचा...मुंबई! चाळीचा भाग पत्त्यासारखा कोसळला, 6 जणांचा जागीच मृत्यू…
मुंबईः मुंबईतील मानखुर्द भागात एका तीन मजली चाळीचा भाग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. धोकादायक असलेली ही चाळ रिकामी करण्यासाठी घरातील सामान आवरत असतानाच अचानक पावसाने घात केला आणि संपूर्ण घर कोसळले. या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्यामुळे 5 लहान मुले आणि एका महिलेसह 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुंबईतील मानखुर्द भागात जनता नगर परिसरात काल, […]
अधिक वाचा...राजगड पाहायला निघालेल्या पर्यटकांची बस खोल दरीत कोसळली बस…
पुणे : ऐतिहासिक राजगड किल्ला पाहण्यासाठी मुंबईहून निघालेल्या पर्यटकांची खाजगी ट्रॅव्हल्स बस पाबे घाटातील खोल दरीत कोसळली. यावेळी झालेल्या भीषण अपघातात दोन पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मुंबईतील अंधेरी परिसरात राहणारे २० जण पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी […]
अधिक वाचा...
