पाकिस्तानी सैनिकांनी युद्धाच्या भितीने तलवार म्यान करण्यास केली सुरूवात…

लाहोर (पाकिस्तान): भारत-पाकिस्तामध्ये आतापर्यंत झालेल्या युद्धांमध्ये अनेक पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला आहे. भारतापुढे निभाव लागत नसल्यामुळे सैनिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून, पाकिस्तानी लष्करातील एकूण 250 अधिकारी 1200 सैनिकांनी तडकाफडकी राजीनामे दिल्याची माहिती आहे. जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या दहशतवादी हल्ल्याचे कनेक्शन नेहमीप्रमाणे पाकिस्तानशी जोडले असल्याची बाब समोर […]

अधिक वाचा...

Pahalgam Terror Attack! बैसरन व्हॅलीत चीनमध्ये बनवलेले सॅटलाईट फोन होते सक्रिय…

नवी दिल्लीः जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या तपासाला अधिक वेग प्राप्त झाला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) गुन्ह्याच्या ठिकाणाचे डिजिटल मॅपिंग केले असून NIA ने घटनास्थळावरून गोळा केलेले नमुने आता न्यायवैदयक प्रयोगशाळेला पाठवण्यात आले आहे. तसेच बैसरन व्हॅलीला जाणाऱ्या रस्त्यांवरील हॉटेल आणि मार्केट परिसरातील CCTV ही ताब्यात घेतले असून त्याची तपासणी सध्या सुरू […]

अधिक वाचा...

भारतीय जवान अजूनही पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात! परत करण्यास नकार…

नवी दिल्लीः पंजाबमधील फिरोजपूरमध्ये चुकून सीमा ओलांडल्याबद्दल पाकिस्तानी सैन्याने एका बीएसएफ जवानाला अटक केली आहे. भारतीय जवानाच्या ठिकाणाबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे सांगत पाकिस्तानने जवानाला परत करण्यास नकार दिला आहे. यामुळे जवानाचे कुटुंबिय काळजीत आहे. बीएसएफच्या 182व्या बटालियनचे कॉन्स्टेबल पीके सिंग 23 एप्रिल रोजी दुपारी शेतकऱ्यांसोबत ड्युटीवर होते. ड्युटी दरम्यान ते सावलीत विश्रांती घेण्यासाठी पुढे गेले […]

अधिक वाचा...

Video: मी आता भारताची सून आहे, मला इथेच राहू द्या: सीमा हैदर

नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले आहेत. शिवाय, भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून पाकिस्तानात परत जावे लागणार आहे. पाकिस्तानमधून आपल्या प्रियकरासाठी देश सोडून भारतात पळून आलेली सीमा हैदर हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती म्हणते आहे की, मला पाकिस्तानला जायचं नाही. […]

अधिक वाचा...

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती पाकिस्तानी? पाहा आकडेवारी…

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे बोलले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निष्पाप भारतीयांचे बळी घेणाऱ्या अतिरेक्यांना गाडण्याचा इशारा दिला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्वाचे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारने दिलेली मुदत संपुष्टात आल्यानंतर एकही पाकिस्तानी […]

अधिक वाचा...

Video: भारतीय विद्यार्थ्यांकडे पाहून पाकिस्तानी अधिकाऱ्याने दिला गळे कापण्याचा इशारा…

लंडन: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. भारताबरोबरच परदेशातही याचे पडसाद उमटत आहेत. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्त भारतीय विद्यार्थ्यांनी लंडनमध्ये पाकिस्तानी दूतावासासमोर देखील आंदोलन केले आहे. यापाकिस्तानी डिप्लोमॅटच्या कृत्यानं संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. विद्यार्थी आंदोलन करत असताना पाकिस्तानी कर्नल तैमूर यांनी बाल्कनीत उभे राहून भारतीय आंदोलकांकडे पाहून थेट आपल्या गळ्यावरून अंगठा […]

अधिक वाचा...

पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार; भारताकडून चोख प्रत्युत्तर…

श्रीनगर (जम्मू-काश्मीर): पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील सीमेवर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. भारताने पाकिस्तानवर दबाव वाढवण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. एलओसीवर पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला असून, भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून कुरापती सुरूच आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) अनेक पाकिस्तानी चौक्यांवर रात्रीच्या सुमारास गोळीबार सुरू होता. […]

अधिक वाचा...

भारत-पाक बॉर्डर! भारतीय जवानाला पाकिस्तान रेंजर्सने घेतले ताब्यात…

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वच स्तरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दहशतवादी हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारताकडून तयारी सुरू असताना भारत पाकिस्तान सीमेवर एक जवान अचानक सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये गेला आहे. या जवानाना पाकच्या सैन्याने ताब्यात घेतले आहे. फिरोजपूर स्थित सीमारेषेवरील ही घटना घडली आहे. भारत-पाकिस्तान बॉर्डरवरील फिरोजपूर स्थित झिरो लाईन पार करुन बीएसएफचा […]

अधिक वाचा...

लष्कर-ए-तोएबाचा प्रमुख हाफिज सईदचा उजवा अबू कटाल याची हत्या…

लाहोर (पाकिस्तान): मुंबई 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड, लष्कर-ए-तोएबाचा प्रमुख हाफिज सईदचा उजवा अबू कटालची शनिवारी रात्री हत्या करण्यात आली आहे. त्याशिवाय आणखी एकाला कंठस्नान घालण्यात आले आहे. ही व्यक्ती हाफिज सईद असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या घटनेने पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स आणि पाकिस्तानी हँडलवर हाफिज सईदवर हल्ला झाल्याचा दावा करण्यात आला […]

अधिक वाचा...

पाकिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला, रेल्वे हायजॅक ; 6 जवान ठार, प्रवासी ओलीस…

लाहोर (पाकिस्तान): बलोच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानमध्ये ट्रेन हायजॅक केली असून 6 पाकिस्तानी सैनिकांना ठार मारले आहे. रेल्वेमधील प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेसला हायजॅक करण्यात आले आहे. बलूच आर्मीकडून 6 पाकिस्तानी सैनिकांना ठार करण्यात आले आहे. स्वंतत्र बलुचिस्तानच्या मागणीसाठी या परिसरात बलूच बिलरेशन आर्मी कार्यरत आहे. वेगळ्या बलुचिस्तानसाठी त्यांचा […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!