हृदयद्रावक! वरमाय-वरपित्यासह लग्न ठरलेल्या दुचाकीस्वार युगुलाचाही अपघाती मृत्यू…
जळगाव : अमळनेर-धुळे रस्त्यावरील मंगरूळ जवळ मंगळवारी (ता. ९) सकाळी ७ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण तिहेरी अपघाताने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघातात वरमाय-वरपित्यासह लग्न ठरलेल्या दुचाकीस्वार युगुलाचाही मृत्यू झाला आहे. व्यारा (गुजरात) येथील सुरेश विक्रम महाजन आणि अनिता महाजन यांच्या मुलाचे येत्या १९ जून रोजी लग्न ठरले होते. त्यातच त्यांच्या भाच्याचा साखरपुडा अमळनेर […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! मामाच्या गावाला निघालेल्या दोन सख्ख्या बहिणींचा अपघातात जागीच मृत्यू…
सातारा: मामाच्या गावाला निघालेल्या दोन सख्ख्या बहिणींचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना निरा-मोरगाव राज्य मार्गावरील चौधरवाडी फाटा परिसरात येथे घडली आहे. सेजल ज्ञानेश्वर बोरडे (वय 17) आणि अक्षरा ज्ञानेश्वर बोरडे (वय 15) अशी मृत बहिणींची नावे आहेत. तर लहान भाऊ पवन (वय 12) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे […]
अधिक वाचा...भीषण अपघात! सातारच्या आठ मित्रांची हर्णे बीचची ट्रीप ठरली अखेरची; पाहा मृतांची नावे…
रायगड: रायगड जिल्ह्याच्या आंबेनळी घाटात रविवारी रात्रीच्या सुमारास पर्यटकांची एक स्कॉर्पिओ गाडी अनियंत्रित होऊन थेट ७०० ते ८०० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात गाडीतील सर्व ८ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे सर्व मृत पर्यटक सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. सर्वजण वीकेंड साजरा करण्यासाठी शुक्रवारी दापोलीजवळील हर्णे बीचवर गेले होते. मात्र त्यांची ही कोकण […]
अधिक वाचा...पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकचा भीषण अपघात; 12 जणांचा मृत्यू तर…
पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वऱ्हाडाचा ट्रक आणि कंटेनरमध्ये हा भीषण अपघात झाला असून, यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला आहे. २० ते २५ जण जखमी असून, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. पालघरच्या धानीवरी येथे वऱ्हाडाची ट्रक आणि कंटेनर मध्ये भीषण […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी जाऊन घेतला जगाचा निरोप…
कोल्हापूर: एका भीषण अपघातामध्ये पत्नी आणि दोन मुलांना डोळ्यादेखत गमावल्यानंतर तेव्हापासून नैराश्यात गेलेल्या वडिलांनी त्याच ठिकाणी आपल्या पत्नीला आणि दोन मुलांना शेवटचा हार अर्पण करून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विराट विठ्ठललाल गौतम (वय 58) असे या वडिलांचे नाव आहे. विराट विठ्ठललाल गौतम पुण्याच्या मांजरी बुद्रुक परिसरातील रहिवासी होते. या घटनेमुळे […]
अधिक वाचा...मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू तर…
मुंबईः मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील नव्याने सुरू झालेल्या ‘मिसिंग लिंक’ परिसरात शुक्रवारी (ता. १५) भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांकडून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे आणि मृतांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे महामार्गावर बसने 3 खाजगी वाहनांना जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याची […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नववधूसह तीन जणांचा अपघाती मृत्यू…
जळगाव: लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नववधूसह तीन जणांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. गुजरातच्या वापीहून लग्नाचे वऱ्हाड घेऊन अकोल्याकडे परतणाऱ्या क्रूझर वाहनाला जळगाव जिल्ह्यातील धरणगाव जवळ भीषण अपघात झाला. या अपघातात नववधू पूजा वाघळकर (वय २२) हिच्यासह तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एका चिमुरड्यासह ६ जण मृत्यूशी झुंज देत आहेत. अकोला येथील पूजा […]
अधिक वाचा...अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा समृद्धी महामार्गावर अपघातात जागीच मृत्यू…
नाशिक : भोंदूबाबा अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचा समृद्धी महामार्गावर आज (शुक्रवार) अपघातात मृत्यू झाला आहे. संभाजी नगरहून शिर्डीला जात असताना अपघात झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेळके आपल्या कुटुंबासह कारने प्रवास करत होते. धोत्रे गावाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कंटेनरचा अंदाज न आल्याने त्यांची कार थेट कंटेनरच्या मागील भागात घुसली. ही धडक […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! नवविवाहित दांपत्याचा होरपळून मृत्यू; एका चितेवर तिघांचा अंत्यविधी…
नाशिक: एका नवविवाहित दांपत्याचा अपघातानंतर होरपळून मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. सिन्नरच्या पंचाळे शिवारात शनिवारी मध्यरात्री झालेल्या अपघाताने सगळेच सुन्न झाले आहेत. सिन्नर तालुक्यातील पंचाळे शिवारात शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ट्रक आणि जीपचा भीषण अपघात झाला. या अपघातात जीपच्या केबिनने पेट घेतल्यामुळे एका नवदाम्पत्यासह तिघांचा होरपळून मृत्यू झाला, तर एक महिला बाहेर फेकली […]
अधिक वाचा...समृद्धी महामार्गावर बाजूला काम करत असलेल्या 6 महिलांना ट्रकने चिरडलं…
जालना : समृद्धी महामार्गावर एक भरधाव ट्रकने मजुरांना चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात 5 ते 6 महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ६ ते ७ जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहे. समृद्धी महामार्ग […]
अधिक वाचा...
