सतीश वाघ यांची हत्या! पत्नीचे मुलाच्या मित्रासोबत प्रेमसंबध; A to Z घटनाक्रम…
पुणे : भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्या प्रकरणात त्यांच्या पत्नीनेच सुपारी दिल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे. स्वत:च्या मुलाच्या मित्रासोबतच मोहिनी वाघ यांचे प्रेमसंबंध असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. गेल्या आठ ते दहा वर्षांपासून मोहिनी आणि अक्षयचे प्रेमसंबंध असल्याची माहिती पुढे आली आहे. आपल्या प्रेमात नवऱ्याचा अडसर येतो या प्रमुख कारणासह इतरही […]
अधिक वाचा...धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी उचललं…
बीडः राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता कैलास फड याचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ अंजली दमानिया यांनी ट्विट केला. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. कैलास फड याला परळी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान न्यायालयात हजर केले असताना कैलास फडला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! पुणे-नगर महामार्गावरील वाघोली येथे डंपरने ९ जणांना चिरडलं; पाहा नावे…
पुणे: अमरावतीवरून कामासाठी पुण्यात आलेल्या 9 जणांना पुणे-नगर महामार्गावरील वाघोली-केसनंद परिसरात डंपरने चिरडल्याची घटना घडली आहे. यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला असून, 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. पुणे शहरात काम शोधण्यासाठी आलेल्या या कामगारांनी फुटपाथवर आसरा घेतला होता. पण भरधाव वेगाने आलेल्या डंपरने 9 जणांना चिरडले. यामध्ये 3 जणांचा […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! नाशिकचे कुटुंब उपचारासाठी मुंबईला अन् समुद्रात बुडाले…
मुंबई : मुंबईतील गेट-वे ऑफ इंडियावरून एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल फेरीबोटीला एक सुसाट स्पीड बोटीने धडक दिली. या अपघातात नौदलाच्या तीन कर्मचाऱ्यांसह १३ जणांचा मृत्यू झाला आहे. १०१ जण सुखरूप बचावले आहेत. या अपघातात नाशिकहून मुंबईला उपचारासाठी आलेलं संपूर्ण कुटुंब काळाच्या पडद्याआड गेले आहे. दोन दिवस रुग्णालयात उपचार केल्यानंतर हे कुटुंब समुद्र सफारीचा आनंद घेण्यासाठी गेट […]
अधिक वाचा...संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; अहवालात भयंकर छळ अन् क्रूर…
बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. यामध्ये देशमुख यांचा मृत्यू अतिरक्तस्रावाने झाल्याचे म्हटले आहे. आठ पानांचा हा अहवाल वाचल्यास संतोष देशमुख यांना किती छळ करुन भयंकर क्रूर पद्धतीने मारण्यात आले, याची कल्पना येऊ शकते. आरोग्य विभागाने संतोष देशमुख यांचा शवविच्छेदन अहवाल सीआयडीकडे सुपूर्द केला आहे. सरपंच संतोष […]
अधिक वाचा...धक्कादायक! एलिफंटाला ८० प्रवाशांना घेऊन जाणारी बोट बुडाली…
मुंबई : गेट वे ऑफ इंडियापासून एलिफंटाकडे जाणारी नीलकमल नावाची एक प्रवासी बोट बुडाल्याची घटना मुंबईत घडली. या बोटीत सुमारे 80 प्रवासी होते. त्यापैकी 77 प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. तर तीन प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. घटनास्थळी बचाव कार्य पूर्ण झाले आहे. एलिफंटाकडे जात असताना उरण, कारंजाजवळ ही दुर्घटना घडली आहे. समोरून येणाऱ्या इंडियन […]
अधिक वाचा...IPS अधिकाऱ्याची पत्नी आमदार मेघना बोर्डीकर यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी…
नागपूर : महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी (ता. १५) पार पडला आहे. या मंत्रिमंडळात चार लाडक्या बहिणींना स्थान देण्यात आले आहे. भाजपाकडून पंकजा मुंडे, मेघना बोर्डीकर आणि माधुरी मिसाळ यांची नावे आहेत. तर राष्ट्रवादीकडून अदिती तटकरे यांच्या नावांचा समावेश मंत्रीमंडळामध्ये करण्यात आला आहे राज्याच्या मंत्रिमंडळात ज्या चार लाडक्या बहिणींना संधी मिळाली त्यामध्ये परभणीच्या जिंतूर विधानसभेच्या […]
अधिक वाचा...साताऱ्यात लाच घेणाऱ्या न्यायाधीश प्रकरणात नवा ट्विस्ट, पोलिस अधिकारी…
सातारा : साताऱ्यातील लाच घेणाऱ्या न्यायाधीश प्रकरणाला नवा ट्विस्ट प्राप्त झाला आहे. न्यायाधिशांना पाच लाखाच्या लाच प्रकरणात सहाय्य करणाऱ्या इतर तिघा आरोपींपैकी एक पोलिस अधिकारी असल्याचे समोर आले आहे. आरोपी किशोर खरात हे सहाय्यक पोलिस निरिक्षक असल्याचे तपासात उघड झाले आहे. किशोर खरात हे मुंबई पोलिस खात्यात कार्यरत असून वरळी येथे ते कार्यरत आहेत. न्यायाधीश […]
अधिक वाचा...ठाकरे गटाच्या शहर प्रमुखाचं अपहरण! आज फक्त उचललंय, यानंतर जीवे मारू…
नांदेड: नांदेडमध्ये ठाकरे गटाच्या शहरप्रमुखाला बंदूकीच्या धाकानं जबरदस्तीनं गाडीत बसवून नेत अपहरण करण्यात आले. ‘जमीन विक्रीचे धंदे बंद कर, आज तुला उचचले आहे, राजकीय नेत्याबद्दल बोलशील तर याद राख,’ असे म्हणत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याची तक्रार केल्यानंतर इतवारा पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडमध्ये सरपंचाचे अपहरण आणि हत्याकांडानंतर महाराष्ट्र हादरला आहे. दरम्यान, […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! विद्यार्थ्याने पेपर लिहिता लिहिताच घेतला जगाचा निरोप…
बीड : वर्गात पेपर लिहिता लिहिता एका विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. विद्यार्थ्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर शिक्षकांनी तातडीने त्याला दवाखान्यात हलवले. मात्र, उपचारापूर्वीच मृत्यूने त्याला गाठले. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बीएससची परीक्षा देताना परीक्षा कक्षातच विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बीडच्या के एस के महाविद्यालयात घडली. सिद्धार्थ […]
अधिक वाचा...
