सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळेला घेतलं ताब्यात…

बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्यासह सुधीर सांगळे याला पकडल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवाय, हत्येच्या दिवशी संतोष देशमुख यांचे लोकेशन देणाऱ्या आणखी एका संशयितालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. असे एकूण तिघा जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना […]

अधिक वाचा...

वाल्मिक कराडनंतर आणखी एक मोठा मासा गळाला; पण तो कोण?…

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलीसांचा तपास सुरू आहे. मुख्य आरोपी वाल्मिक कराडने सीआयडीसमोर सरेंडर केले होते. पोलिसांनी आणखी एका मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे असे तीन आरोपी फरार होते. त्यांच्या मागावर देशभर पोलीस पथकं रवाना झाली होती. आता यातील एका […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यातील शिक्षक दाम्पत्यानं संपवलं जीवन…

पुणे : कौटुंबिक ताणतणावातून वारूळवाडी (ता. जुन्नर, जि. पुणे ) येथील डिंभा डावा कालव्यात उडी मारून शिक्षक दाम्पत्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. चिराग चंद्रशेखर शेळके (वय 28) व त्यांच्या पत्नी प्रा. पल्लवी (वय 24) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. चिराग व प्रा.पल्लवी यांचा एक वर्षांपूर्वी विवाह झाला होता. या शिक्षक दांपत्याचे मृतदेह […]

अधिक वाचा...

वाल्मिक कराड अडचणीत! संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याची पोलिसांसमोर कबुली…

बीड: सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व हत्या प्रकरणातील विष्णू चाटे याने दिलेल्या माहितीनंतर वाल्मिक कराड याच्या अडचणीत वाढ होणार आहे. खंडणीप्रकरणी अटकेत असलेल्या विष्णू चाटे याने चौकशीत मोठी कबुली दिलेली आहे. वाल्मिक कराडने पवन चक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संभाषण केले होते, वाल्मिक कराड याचे अधिकाऱ्यांशी बोलणे झाल्याचे चाटे यानी कबुली दिली आहे. सीआयडीने न्यायालयात […]

अधिक वाचा...

तुळजापूरमधील सरपंचाने स्वत:च रचला होता हल्ल्याचा बनाव; पोलिस तपासात कारण समोर…

धाराशिव: तुळजापूरमधील सरपंचावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने खळबळ उडाली होती. पण, सरपंच नामदेव निकम यांची फिर्याद आणि घटनास्थळ पंचनाम्यातील तफावतीमुळे हा बनाव उघड झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सरपंचाने बंदुकीचे लायसन्स मिळवण्यासाठी हल्ल्याचा बनाव रचल्याचे स्पष्ट झाले आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर सत्ता वर्चस्व दाखवण्यासाठी पिस्तूल, गन बाळगण्याचे लायसन्स मिळवण्यासाठी वाटेल […]

अधिक वाचा...

संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश; पाहा नावे…

बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासाला सध्या वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केल्याप्रमाणे बुधवारी विशेष तपास पथक अर्थात एसआयटी गठित करण्यात आली. या एसआयटी समितीमध्ये 10 जणांचा समावेश आहे. पुणे सीआयडीचे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्याकडे या एसआयटी समितीचे नेतृत्त्व देण्यात आले आहे. एसआयटी पथकात बीड […]

अधिक वाचा...

वाल्मिक कराड प्रवास: घरगडी ते बीडमधील महत्त्वाचा सत्ताकेंद्र…

बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा संशयित मास्टरमाईंड म्हणून वाल्मिक कराड आज (मंगळवार) पुणे येथील सीआयडी कार्यालयात शरण आला आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा घरगडी असणारा वाल्मिक कराड हा परळी आणि बीडमधील महत्त्वाचा सत्ताकेंद्र झाला होता. वाल्मिक कराड हा मूळचा परळी तालुक्यातील पांगरी गोपीनाथ गड गावातील आहे. शेतकरी कुटुंबाची […]

अधिक वाचा...

वाल्मिक कराड अखेर शरण! पुण्यातील CID ऑफीसमध्ये लावली हजेरी…

पुणे: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सूत्रधार असल्याचा आरोप केलेला वाल्मिक कराड आज (मंगळवार) सीआयडीसमोर शरण आला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड तीन आठवड्यांपासून फरार होता. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी फरार आहेत. त्यामध्ये वाल्मीक कराड याचेही नाव होते. […]

अधिक वाचा...

वाल्मिक कराड याच्या सरेंडरबाबत CID च्या अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती…

पुणे : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपीला अटक करण्यात आली असून, तीन आरोपी अद्याप फरार आहेत. या प्रकरणाचा तपास सीआयडी करत असून गेल्या तीन दिवसापासून सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी बीड जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. या सगळ्या घडामोडीत वाल्मिक कराडने पुण्यात आत्मसर्मपण (सरेंडर) केल्याचे वृत्त समोर आले होते. यावर सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी महत्त्वाची […]

अधिक वाचा...

महाराष्ट्रातील पुन्हा एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, जाळण्याचा प्रयत्न…

धाराशिव: बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर मोठी खळबळ उडाली असतानाच आता धाराशिव जिल्ह्यातही असाच एक प्रकार घडला आहे. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील सरपंच नामदेव निकम यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. तुळजापूरमधील बारुळ गावानजीक हा प्रकार घडला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. नामदेव निकम हे मेसाई जवळगा गावचे सरपंच आहेत. नामदेव […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!