भाजप नगरसेविकेच्या मुलावर सपासप तलवारीने वार करत केली निर्घृण हत्या…

वर्धा: वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमाभागात रेती घाटाच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यात पुलगावच्या भाजपा नगरसेविकेचा मुलगा भरत नागपाल यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. टोळक्याने त्यांच्यावर तलवारीने सपासप वार केले आहेत. हा हल्ला इतका भयंकर होता की यात नगरसेविकेच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण वर्ध्यासह चंद्रपूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. […]

अधिक वाचा...

प्रसिद्ध नृत्यंगणा गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात तुफान राडा…

वर्धा: वर्धा शहरात आयोजित केलेल्या प्रसिद्ध नृत्यंगणा गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमादरम्यान तुफान राडा झाला. मागच्या प्रेक्षकांना स्टेजवरील डान्स नीट दिसत नसल्याच्या कारणावरून हा राडा सुरू झाला आणि एकमेकांच्या अंगावर खुर्च्या फेकल्यामुळे मोठ्या गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. काही प्रेक्षक एकमेकांच्या दिशेने प्लास्टिकच्या खुर्च्या फेकत होते. जमिनीवर खुर्च्या आदळून त्यांची तोडफोड करण्यात आली. या गोंधळामुळे कार्यक्रमाच्या […]

अधिक वाचा...

नवोदय विद्यालयाच्या शिक्षकाने केली आत्महत्या; चिठ्ठीत लिहिले…

वर्धा : वर्धा जिल्ह्यातील सेलूकाटे येथील नवोदय विद्यालयाच्या शिक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संजय पंडित देवडे (वय 53) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. या शिक्षकाच्या मृतदेहाशेजारी पोलिसांना एक चिठ्ठी आढळली आहे. शिक्षकाच्या आत्महत्येमुळे विद्यार्थी-शिक्षकांमध्ये शोककळा पसरली आहे. संजय देवडे हे नवोदय विद्यालयात शिक्षक म्हणून कामावर रूजू होते. शाळेच्या परिसरात असलेल्या क्वाटरमध्ये ते […]

अधिक वाचा...

काकू अन् चुलत भावाला कुऱ्हाडीनं संपवलं अन् आरोपीनं…

वर्धा: वर्धा जिल्ह्यातील निमसडा गावात शेतीच्या वादावरून झालेल्या वादात चुलत भावाने आपल्या काकू आणि चुलत भावाची कुऱ्हाडीने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर आरोपीने विष प्राशन करून आत्महत्या केली. या दुहेरी खून आणि आत्महत्येच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. साधना सुभाष मोहिजे (वय 55) आणि त्यांचा मुलगा नितीन सुभाष मोहिजे (वय 27) यांचा […]

अधिक वाचा...

वाढदिवसाच्या पार्टीला गेलेल्या तीन मित्रांचा अपघाती मृत्यू…

वर्धा : वाढदिवसाच्या पार्टीला गेलेल्या तीन मित्रांचा अपघाती मृत्यू झाला असून, अन्य एक मित्र गंभीर जखमी झाला आहे. वर्धा नागपूर रस्त्यावरूल सेलू बायपास परिसरात त्यांच्या कारला अपघात झाला. भरधाव कार पलटी झाल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. सेलू पोलिस पुढील तपास करत आहेत. शुभम मेश्राम, सुशील मस्के आणि समीर सुटे अशी मृत पावलेल्या तीन मित्रांची नावे […]

अधिक वाचा...

महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी केला सामूहिक अत्याचार…

वर्धा : एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर पाच जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. वर्धा जिल्ह्यातील आर्वी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पीडित अल्पवयीन मुलीचा मित्र तिला 10 फेब्रुवारी रोजी सकाळी आपल्या […]

अधिक वाचा...

कराळे मास्तरांना भर रस्त्यात कॉलर पकडून मारहाण…

वर्धा : वर्ध्यामध्ये कराळे मास्तरांना मारहण झाल्याची घटना घडली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप नितेश कराळे यांनी केला आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. वर्ध्याच्या उमरी येथे ही घटना घडली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते नितेश कराळे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बुथ लावण्याच्या कारणातून बाचाबाची झाली. बाचाबाचीचे पर्यावसान नंतर हाणामारीत झाले आहे. उमरीचे […]

अधिक वाचा...

प्रेयसीच्या साखरपुड्यानंतर नवऱ्याच्या घराच्या गेटला लावली बॉम्बसदृश वस्तू अन् पुढे…

वर्धा : एका घरासमोरील गेटला बॉम्बसदृश वस्तू अडकवली असल्याचे दिसून आल्यानंतर एकच गोंधळ उडाला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बॉम्बसदृश्य वस्तू तिचं वायर कापून निकामी केली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र या घटनेने परिसरात चांगलीच दहशत निर्माण झाली. प्रेम प्रकरणातून हा सगळा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. आर्वीच्या विठ्ठल वॉर्डमध्ये ही घटना घडली […]

अधिक वाचा...

प्रेमी युगलाने एकमेकांना घट्ट बांधून विहिरीत उडी घेतली अन्…

वर्धा: आर्वी तालुक्यातील पारडी येथील प्रेमी युगलाने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमीयुगलाने काही दिवसापूर्वी पलायन केले होते. शनिवारी (ता. ३) दोघांचेही मृतदेह एका विहिरीत आढळून आले आहेत. मृत मुलाचे नाव हर्षल बाबाराव वाघाडे (वय २२) असे आहे, मृत मुलगी अल्पवयीन आहे. शेतातील विहिरीतून मृतदेह बाहेर काढल्यानंतर मृतदेहांची ओळख झाली. […]

अधिक वाचा...

थरार! समृद्धी महामार्गावरून पोलिसांनी संशयास्पद ट्रकचा पाठलाग सुरू केला अन्…

नागपूर : समृद्धी महामार्गावर एक ट्रक संशयास्पद अवस्थेत प्रवास करत असल्याच्या संशयावरुन पोलिसांनी त्याचा पाठलाग करून पकडल्यानंतर 50 पेक्षा जास्त गाई आढळल्या आहेत. ट्रकचालकासह दोन जण ट्रक सोडून पसार झाले. पोलिसांनी अज्ञात गो तस्करांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. समृद्धी महामार्गावरील वर्धा जिल्ह्यातून जाणाऱ्या भागात एक ट्रक रविवारी (ता. २८) दुपारी साडे […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!