पुणे अपघात प्रकरणाला नवं वळण; वडील, आजोबानंतर आता आईलासुद्धा होणार अटक?
पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर महागडी पोर्शे कार चालवत असलेल्या धनिक पुत्राने दोघांचे बळी घेतल्यानंतर दरररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी ससूनमधील दोन डॉक्टरांसह वॉर्डबॉयला निलंबित केले आहे. तर डीनला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. आता अल्पवयीन मुलाच्या वडील आणि आजोबानंतर त्याच्या आईलासुद्धा अटक केली जाण्याची शक्यता आहे. वडील […]
अधिक वाचा...भीषण अपघात! सांगलीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू; पाहा नावे….
सांगली: तासगाव-मणेराजुरी मार्गावर मंगळवारी (ता. २८) मध्यरात्री कारला झालेल्या भीषण अपघातामध्ये एकाच कुटुंबामधील सहा जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मृतांमध्ये तीन लहान बालकांचा समावेश आहे. चिमुकलीचा वाढदिवस साजरा करून हे कुटुंब परतत होतं, तेव्हाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. अपघातामधून सुदैवाने एक मुलगी बचावली पण तिला सहा मृतदेहांसोबत अख्खी रात्र काढावी लागली. पोलिसांनी दिलेल्या […]
अधिक वाचा...पुणे अपघातातील धनिकपुत्राचे ब्लड सॅम्पल बदलणारा डॉक्टर लागला घडाघडा बोलायला…
पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर येथे महागड्या पोर्शे कारने दोघांना चिलडल्यानंतर अपघातातील धनिकपुत्र अल्पवयीन चालकाला वाचविण्यासाठी प्रयत्न झाले आहेत. ससून रुग्णालयात तर अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुनेच बदलल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दोन डॉक्टरांना ताब्यात घेतल्यानंतर चौकशी सुरू केल्यानतंर ते घडाघडा बोलायला लागले आहेत. अल्पवयीन धनिकपुत्र असलेल्या अल्पवयीन आरोपीवर पोलिसांकडून करण्यात आलेली कारवाई, त्यानंतर […]
अधिक वाचा...ससून रुग्णालयातील डॉक्टरांनीच नव्हे तर अनेकांनी ईमान विकले: रविंद्र धंगेकर
पुणे: पुणे शहरातील कल्याणीनगर अपघातप्रकरणात धनिकपुत्राला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांनीच नव्हे तर अनेकांनी ईमान विकले, असे काँग्रेसचे कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन धक्कादायक आरोप केले आहेत. रविंद्र धंगेकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘पुण्यातील कल्याणीनगर कार अपघात प्रकरणात ससुन रुग्णालयाच्या 2 डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. ब्लड […]
अधिक वाचा...पुणे अपघात प्रकरणी ससूनमधील दोन डॉक्टरांना अटक; ब्लड सॅम्पलची…
पुणे: पुणे शहरातील कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारने दोघांना चिरडणाऱ्या धनिकपुत्राला वाचवण्यासाठी संपूर्ण यंत्रणाच कामाला कशी लागली आहे, याचा आणखी एक धक्कादायक पुरावा समोर आला आहे. बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या मुलाला वाचवण्यासाठी येरवाडा पोलिस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनी मदत केल्याचा आरोप झाला होता. मात्र, आता हा धनिकपूत्र कायद्याच्या तावडीतून सहीसलामत सुटावा, यासाठी ससूनमधील वरिष्ठ डॉक्टरांनीही गैरकृत्य […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये सराफाच्या घरात फर्निचर फोडताच मिळालं भलं मोठं घबाड….
नाशिक : नाशिकमधील कॅनडा कॉर्नर परिसरातील सुराणा ज्वेलर्सवर प्राप्तिकर विभागाने धाड टाकून ३० तास शोध मोहिम राबविली. यानंतर ज्वेलर्समधून तब्बल २६ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. ९० कोटींच्या संपत्तीचे कागदपत्रेही ताब्यात घेण्यात आली आहेत. नागपूर आणि जळगावमधील अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन ही कारवाई केली आहे. जप्त केलेली रोकड मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना १४ तासांचा वेळ लागला. महाराष्ट्रात […]
अधिक वाचा...पुणे शहरात पोर्शेने दोघांना चिरडले तिथंच निबंध लेखन स्पर्धा; विषय पाहा…
पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगरमध्ये अल्पवयीन धनिक पुत्राने महागड्या पोर्शे मोटारीखाली दोघांना चिरडल्याची घटना घडल्यापासून संताप व्यक्त केला जात आहे. बिल्डरच्या अल्पवयीन मुलाला निबंध लिहिण्याच्या आणि आरटीओसोबत वाहतूक नियंत्रण करण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला गेला होता. पुण्यात काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी अपघातस्थळीच निबंध स्पर्धेचे आयोजन केले. माझा बाप बिल्डर असता तर…, अश्विनी आणि अनिशचे […]
अधिक वाचा...पुणे अपघात प्रकरणात अगरवाल कुटुंबीयांचा आणखी एक कारनामा समोर…
पुणे: पुणे शहरातील कल्याणीनगर येथे पोर्शे कारखाली दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी धनाढ्य अगरवाल कुटुंबाकडून विविध मार्गांचा अवलंब केला जात असल्याचे उघड झाले आहे. अगरवाल कुटुंबातील विशाल अगरवाल आणि सुरेंद्रकुमार अगरवाल यांनी याप्रकरणात चालकावर खोटी जबानी देण्यासाठी दबाव आणल्याची माहिती समोर आली आहे. गंगाराम पुजारी असे या चालकाचे नाव असून त्याने पोलिसांना सगळा प्रकार सांगितला […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यात चार मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू…
मंचर, पुणे (कैलास गायकवाड): पुणे जिल्ह्यातील निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील एका शेततळ्यामध्ये शुक्रवारी (ता. २४) दुपारच्या सुमारास चार मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. राधिका नितीन केदारी (वय 14, राहणार कानेवाडी ता. खेड), श्रद्धा काळू नवले (वय वर्ष 13), सायली काळू नवले (वय 11वर्ष), […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! विजेचा शॉक लागून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू…
सातारा : कराड तालुक्यातील गोवारे गावामध्ये असलेल्या विहिरीजवळ असलेल्या फ्युजबॉक्सचा शॉक लागून तुकाराम सदाशिव खोचरे (वय 55) व शहाजी सदाशिव खोचरे (वय 50) या दोन सख्ख्या भावांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तुकाराम आणि शहाजी खोचरे यांची गावच्या भटकी नावाच्या शिवारात शेती आहे. याठिकाणीच त्यांची विहीर होती. या […]
अधिक वाचा...
