
मुंबईच्या नवरदेवाच्या मानेत लग्न सुरु असतानाच बिहारमध्ये घातली गोळी…
पाटणा (बिहार): लग्न सोहळा सुरु असतानाच नवरदेवाच्या गळ्यात गोळी घालून ठार केल्याची भयंकर घटना घडली. मृत नवरदेव मुंबईत टेलर होता. तो लग्नासाठी बिहारमधील खगरियामध्ये गेला होता. मोहम्मद इर्शाद असे नवरेदवाचे नाव आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
इर्शादच्या भावाने सांगितले, विवाहसोहळ्यादरम्यान एक मुलगा आला आणि नवरदेवाच्या शेजारी असलेल्या खुर्चीवर बसला. त्याने बंदूक काढली आणि हवेत गोळी झाडली. त्याने बंदूक लोड केली आणि गोळी झाडताच, गोळी वर जाण्याऐवजी वराच्या मानेत लागली. मुफस्सिल पोलिस स्टेशन परिसरातील कुतुबपूर भागात शनिवारी रात्री 11 वाजता ही घटना घडली. आम्ही इर्शादला खगरिया येथे घेऊन गेलो, पण त्याच्या मानेतून सतत रक्तस्त्राव होत होता. थोड्याच वेळात त्याचा मृत्यू झाला. वधूसमोर हा अपघात झाला.

लग्नात उपस्थित असलेल्यांनी सांगितले की लग्नादरम्यान अचानक गोळीबार झाला. उपस्थितांनी वधूला बाहेर काढले आणि गोंधळ उडाला. आनंदी वातावरण असताना क्षणात सन्नाटा झाला. वराचा भाऊ आणि नातेवाईकांनी इर्शादला रुग्णालयात नेले, परंतु तो वाचू शकला नाही. गोळीबार करणारा आरोपी फरार झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
प्रेम! प्रियकराच्या मृतदेहासोबत केलं लग्न; आयुष्यभर तुझीच राहिल…
लग्न लागले अन् नवरदेवावर केला चाकूने हल्ला; हल्लेखोर निघाला…
75 वर्षांच्या आजोबांचे 35 वर्षीय महिलेशी लग्न; हनिमूनच्या रात्रीच मृत्यू…
पुणे! लग्नानंतर 45 दिवसांत झाला महागडा घटस्फोट; पोटगी पाहा…
लग्नानंतर नवरा म्हणाला, माझे एका मुली सोबत ६ वर्षापासून प्रेम संबंध…

