नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यूचे वाढले गूढ; संशय बळावला…
रत्नागिरी : नीलिमा चव्हाण या युवतीच्या मृत्यूचे गूढ कायम असून, दररोज वेगवेगळे खुलासे समोर येत आहेत. नीलिमा चव्हाण हिच्या घातपाताचा संशय बळावला आहे. नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यू प्रकरणी दोन युवक पोलिसांच्या रडारवर आहेत. पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. नीलिमा चव्हाण प्रकरणात पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले असून, नीलिमाचा घातपात की आत्महत्या लवकरच उघड होणार आहे. […]
अधिक वाचा...पोलिस स्टेशन हद्दीतील भाडेकरूंची माहिती जमा करण्याचे आवाहन…
मंचर (कैलास गायकवाड): पुण्यात तीन दहशतवादी मिळून आल्यामुळे पुणे शहर पोलिस व ग्रामीण पोलिस अॅक्शन मोडवर आले असून, भाडेकरूंची माहिती पोलिस ठाण्यात जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी दहशतवादी पकडल्यानंतर त्यांच्याकडून रोज धक्कादायक खुलासे पुढे येत होते. तसेच ते नाव बदलून पुण्यात राहत असल्याचेही निदर्शनास आले आहे. ज्या ठिकाणी ते राहत होते. त्या […]
अधिक वाचा...बीड पोलिसांकडून शांततेचे आवाहन; अफवा पसरवू नका…
बीड: केज तालुक्यातील आडस गावात एकाने आक्षेपार्ह मजकूर असलेला स्टेटस ठेवल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाल्या नंतर दोन गटात वाद सुरु झाला होता. पोलिसांनी दोन्ही गटाच्या एकूण 21 जणां विरुद्ध धारुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बीड पोलिसांनी अफवा पसरवू नये असे सांगतानाच शांततेचे आवाहन केले आहे. आडस गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन गटात […]
अधिक वाचा...ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे तिघांना गमवाला लागला जीव…
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड लोहखनीच प्रकल्पामध्ये रविवारी (ता. ६) संध्याकाळी एका ट्रकचा ब्रेक फेल झाल्यानंतर ते दुसऱ्या वाहनाला धडकले. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी आहेत. एटापल्ली तालुक्यात हेडरीजवळ सूरजागड लोहखनिज प्रकल्प आहे. या ठिकाणी लोह खनिजाचे उत्खनन झाल्यानंतर मोठ्या ट्रकमधून हे लोहखनिज बाहेर घेऊन जात होते. टायवा ट्रक […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात विहिरीत कोसळला मातीचा ढिगाळा; चौघे अडकले…
पुणे : इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथे विहिरीची रिंग आणि मातीचा ढिगारा कोसळला असून, या ढिगाऱ्याखाली चार जण अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य केले जात आहे. म्हसोबावाडी गावात विहिरीला रिंग टाकण्याचे काम सुरू होते. त्यावेळी अचानक रिंग मारलेला स्लॅबचा भाग आणि मातीचा ढिगारा विहिरीत कोसळला. यामध्ये […]
अधिक वाचा...पुणे-नगर महामार्गावर PMPMLच्या दोन बस समोरासमोर धडकल्या; प्रवासी जखमी…
पुणे : पुणे-नगर महामार्गावर पीएमपीएमएलच्या दोन बसेसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात २९ प्रवासी जखमी झाले आहेत. चालकाला गंभीर दुखापत झाली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र दोन्ही बसेसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाघोली आगारातील कात्रज ते वाघोली बस वाघोलीच्या […]
अधिक वाचा...पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर; पाहा वाहतूकीतील बदल…
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (ता. १) पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या फुगेवाडी ते सिव्हील कोर्ट आणि गरवारे कॉलेज ते रुबी हॉल मार्गिकेचे लोकार्पण होणार आहे. या वेळी सकाळी दहा ते दुपारी अडीच या वेळेत पंतप्रधान मोदी हे पुण्यात असणार आहेत. पुणे शहरातील विविध विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम 1 ऑगस्ट रोजी शहराच्या मध्यवर्ती […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! क्षणभर छोट्या भावाला काहीच उमगलंच नाही…
नाशिक: घरामध्ये दोघे भाऊ झोका खेळत असताना अचानक एकाला गळफास लागल्याने दहा वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. क्षणभर भावाला काहीच उमगलं नाही. घरातल्या लोकांना ही बाब कळल्यानंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. नाशिकच्या अंबड भागातील चुंचाळे अश्विन नगर परिसरात म्हाडा कॉलनीत ही घटना घडली आहे. निखिल निंबा सैंदाणे (वय १०) याचा घरातील […]
अधिक वाचा...पुण्यातून कोकणात फिरायला जाताना कार धरणात बुडाली; युवतीसह तिघांचा मृत्यू
पुणे : पुण्यातून कोकणात फिरायला जाताना नीरा देवघर धरणाच्या पाण्यात कार कोसळून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन युवक आणि एका युवतीचा समावेश आहे. एक जण बचावला आहे. पुण्याहून वरंधघाट मार्गे कोकणात जाणाऱ्या मार्गावर ही घटना घडली. अपघातात मृत्यू झालेले सर्वजण पुण्यातील असल्याचे समजते. रावेत येथून चार जण फिरण्यासाठी निघाले होते. तेव्हा भोर […]
अधिक वाचा...दत्ता सामंत हत्या प्रकरणी गँगस्टर छोटा राजनची निर्दोष मुक्तता…
मुंबई : कामगार नेते दत्ता सामंत हत्या प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन आणि गँगस्टर छोटा राजनची सर्व आरोपातून मुक्तता करण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने हा निकाल दिला आहे. कामगार नेते दत्ता सामंत हत्या प्रकरणाची गेल्या अनेक वर्षांपासून सुनावणी सुरू होती. या प्रकरणी छोटा राजनला निर्दोष ठरवण्यात आले आहे. या खटल्यातील तो एकमेव आरोपी […]
अधिक वाचा...
