बापरे! प्रेमास नकार देणाऱ्या मुलीची आईसमोरच केली हत्या…
कल्याण : कल्याणमध्ये असलेल्या तिसगाव परिसरात एका युवकाने बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर चाकूने केलेल्या हल्ल्यात मुलीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आसपासच्या नागरिकांनी त्या तरुणाला पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आदित्य कांबळे असे मुलीवर हल्ला करणाऱ्या युवकाचे नाव आहे. मुलीवर केलेल्या हल्ल्यानंतर फिनेल प्यायला होता. त्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यातील भाटघर धरणात बुडून वडील आणि मुलीचा मृत्यू…
पुणे : पुणे जिल्ह्यातील भाटघर धरणात वडील आणि मुलगी बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून वडील अद्याप बेपत्ता आहेत. ऐश्वर्या धर्माधिकारी (वय 13) आणि शिरीष धर्माधिकारी (वय 45, रा. बालेवाडी) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. बालेवाडी येथे राहणारे फालक आणि धर्माधिकारी कुटुंब 15 ऑगस्ट रोजी भोर तालुक्यातील जयतपाड गावातील मुंगळे […]
अधिक वाचा...पुणे शहरातील आयटी अभियंत्याचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू…
पुणे : मित्रांसोबत फिरायला गेलेल्या आयटी अभियंत्याचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज (मंगळवार) दुपारी साडेबाराच्या सुमारास रिहे (मुळशी) गावच्या हद्दीत घडली आहे. हर्षित पोटलुरी (वय 27, मुळ रा. राजमुन्ड्री, आंध्र प्रदेश) असे मृत्युमुखी पडलेल्या आयटी अभियंत्याचे नाव आहे. हर्षित हा काही महिन्यांपासून हिंजवडी येथे राहत होता. तो हिंजवडी आयटी पार्क फेज तीन मधील एका […]
अधिक वाचा...धक्कादायक! राजगडावर अजयचा मृतदेह पाहून मित्र घाबरले…
पुणे : राजगडावर फिरायला आलेल्या पर्यटकाचा गडावरील पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अजय मोहनन कल्लामपारा (वय ३३, रा. भिवंडी, ठाणे) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. किल्ल्यावरील पद्मावती पाण्याच्या टाकीत पडून अजयचा मृत्यू झाला. टाकीतील पाणी काढण्यासाठी गेला असता तोल जाऊन अजय पाण्यात पडला. मृतदेह […]
अधिक वाचा...पुणे शहरात ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे, दोघांना अटक…
पुणे : पुणे शहरातील कोंढवा परिसरात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच सोमवारी (ता. १४) ‘पाकिस्तान जिंदाबाद चे नारे दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कोंढवा परिसरात एका शाळेचे बांधकाम सुरु आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही व्यक्ती बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम […]
अधिक वाचा...शिक्षणाच्या माहेरघरात लाच घेताना डीनला पकडले रंगेहात अन्…
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या नव्याने स्थापन झालेल्या अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी सोळा लाख रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामधील दहा लाख रुपये स्वीकारताना डीनला रंगेहात पकडण्यात आले होते. लाचखोर डीन विरोधात मनसे विद्यार्थी सेना आक्रमक झाली आहे. त्यांनी अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातील लाचखोर डीन आशिष श्रीनाथ बनगिनवार यांच्या कार्यालयात शिरुन कार्यालयाची […]
अधिक वाचा...नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यूचे वाढले गूढ; संशय बळावला…
रत्नागिरी : नीलिमा चव्हाण या युवतीच्या मृत्यूचे गूढ कायम असून, दररोज वेगवेगळे खुलासे समोर येत आहेत. नीलिमा चव्हाण हिच्या घातपाताचा संशय बळावला आहे. नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यू प्रकरणी दोन युवक पोलिसांच्या रडारवर आहेत. पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. नीलिमा चव्हाण प्रकरणात पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले असून, नीलिमाचा घातपात की आत्महत्या लवकरच उघड होणार आहे. […]
अधिक वाचा...पोलिस स्टेशन हद्दीतील भाडेकरूंची माहिती जमा करण्याचे आवाहन…
मंचर (कैलास गायकवाड): पुण्यात तीन दहशतवादी मिळून आल्यामुळे पुणे शहर पोलिस व ग्रामीण पोलिस अॅक्शन मोडवर आले असून, भाडेकरूंची माहिती पोलिस ठाण्यात जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी दहशतवादी पकडल्यानंतर त्यांच्याकडून रोज धक्कादायक खुलासे पुढे येत होते. तसेच ते नाव बदलून पुण्यात राहत असल्याचेही निदर्शनास आले आहे. ज्या ठिकाणी ते राहत होते. त्या […]
अधिक वाचा...बीड पोलिसांकडून शांततेचे आवाहन; अफवा पसरवू नका…
बीड: केज तालुक्यातील आडस गावात एकाने आक्षेपार्ह मजकूर असलेला स्टेटस ठेवल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाल्या नंतर दोन गटात वाद सुरु झाला होता. पोलिसांनी दोन्ही गटाच्या एकूण 21 जणां विरुद्ध धारुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बीड पोलिसांनी अफवा पसरवू नये असे सांगतानाच शांततेचे आवाहन केले आहे. आडस गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन गटात […]
अधिक वाचा...ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे तिघांना गमवाला लागला जीव…
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड लोहखनीच प्रकल्पामध्ये रविवारी (ता. ६) संध्याकाळी एका ट्रकचा ब्रेक फेल झाल्यानंतर ते दुसऱ्या वाहनाला धडकले. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी आहेत. एटापल्ली तालुक्यात हेडरीजवळ सूरजागड लोहखनिज प्रकल्प आहे. या ठिकाणी लोह खनिजाचे उत्खनन झाल्यानंतर मोठ्या ट्रकमधून हे लोहखनिज बाहेर घेऊन जात होते. टायवा ट्रक […]
अधिक वाचा...
