पोलिस भरती! सरकार 10 हजार पदांची करणार भरती…

मुंबई : राज्यातील वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारीचे प्रमाण पाहता राज्य सरकार मोठ्या प्रमाणात पोलिस भरती करण्याच्या विचारात आहेत. गुन्हेगारीचा तपास करणे आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सरकार 10 हजार पदांची भरती करणार आहे. राज्यात फेब्रुवारीनंतर पोलिस भरतीची घोषणा होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. प्रशिक्षण आणि खास पथके विभागाच्या अपर पोलिस महासंचालकांनी राज्यातील सर्व शहर पोलिस […]

अधिक वाचा...

अजित पवार यांनी जळगाव रेल्वे घटनेबाबत दिली संपूर्ण माहिती; 13 मृत्युमुखी…

पुणे: मुंबईकडे जाणाऱ्या ‘पुष्पक’ एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्यांसाठी आगीची अफवा अनेकांसाठी जीवघेणी ठरली आहे. सामान्य श्रेणीतील प्रवाशांनी स्वतःचा जीव वाचविण्यासाठी दोन्ही बाजूंनी बाहेर उड्या घेतल्या आणि जीव वाचवण्यासाठी बाहेर गेले असताना तिथेच घात झाला. मुंबईकडून जळगाव स्थानकाकडे भरधाव वेगात येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने अनेकांना चिरडले. या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. […]

अधिक वाचा...

जळगाव रेल्वे अपघातात ११ जणांचा मृत्यू; केवळ अफवा ठरले कारण…

जळगाव: जळगावच्या परधाडे स्थानकाजवळ अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. चालत्या रेल्वेत आग लागल्याची अफवा पसरल्याने काही प्रवाशांनी थेट ट्रेनमधून उड्या मारल्या आहेत. यात काही प्रवासी समोरून येणार्‍या रेल्वेखाली चिरडले गेले आहेत. आतापर्यंत ११ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. परधाडे स्थानकाजवळ आज (बुधवार) साडेचारच्या सुमारास ही घटना घडली आहे. पुष्कप एक्स्प्रेस मुंबईला चालली […]

अधिक वाचा...

अभिनेता सैफ अली खानचा हल्लेखोराला अटक; खरं नाव समोर…

मुंबई : अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्याला मुंबई पोलिसांनी ठाण्यातून अटक केली. ठाण्यातील हिरानंदानी ईस्टेट लेबर कॅम्प परिसरातून मुख्य आरोपीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी प्रेस कॉन्फरन्स घेत आरोपीविषयी धक्कादायक खुलासे केले आहेत. आरोपी नाव बदलून पोलिसांना चकमा देत होता. अखेर आता मुख्य आरोपीचे खरं नाव समोर आले आहे. ठाण्यातील हिरानंदानी ईस्टेट […]

अधिक वाचा...

मोठी बातमी! वाल्मिक कराड अडचणीत, मकोका अंतर्गत गुन्हा…

बीड: मस्साजोग (ता. केज) गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडभोवती कारवाईचा फास आणखीच घट्ट झाला आहे. वाल्मिक कराड याला सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. न्यायालयात त्याला आज (मंगळवार) हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकिलांनी कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. तर, कराडच्या वकिलाने विरोध केला. न्यायालयातील […]

अधिक वाचा...

अजित पवार यांचा पुणे पोलिसांना कडक इशारा; जमत नसेल तर…

पुणे: पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगने दहशत निर्माण केली आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असताना त्यांनी पुणे पोलिसांना याबाबत कडक इशारा दिला. पुणे शहरात खूनासारख्या घटना दररोज घडत आहेत. बंदूका, पिस्तूल सहजपणे उपलब्ध होत आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीसंदर्भात विचारले असता अजित पवार म्हणाले- पुण्याचा विकास होण्याच्या दृष्टीने […]

अधिक वाचा...

संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश; पाहा नावे…

बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासाला सध्या वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केल्याप्रमाणे बुधवारी विशेष तपास पथक अर्थात एसआयटी गठित करण्यात आली. या एसआयटी समितीमध्ये 10 जणांचा समावेश आहे. पुणे सीआयडीचे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्याकडे या एसआयटी समितीचे नेतृत्त्व देण्यात आले आहे. एसआयटी पथकात बीड […]

अधिक वाचा...

वाल्मिक कराड अखेर शरण! पुण्यातील CID ऑफीसमध्ये लावली हजेरी…

पुणे: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सूत्रधार असल्याचा आरोप केलेला वाल्मिक कराड आज (मंगळवार) सीआयडीसमोर शरण आला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड तीन आठवड्यांपासून फरार होता. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी फरार आहेत. त्यामध्ये वाल्मीक कराड याचेही नाव होते. […]

अधिक वाचा...

सरपंच हत्या प्रकरणानंतर बीडला मिळाले नवीन पोलिस अधीक्षक!

बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यभर गाजत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी विधानसभेत बीडचे पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली केल्याची घोषणा केली होती. बारगळ यांची तडकाफडकी बदली केल्यानंतर अवघ्या २४ तासांत बीडला नवीन पोलिस अधीक्षक मिळाले आहेत. नवनीत कांवत यांची बीडच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संतोष […]

अधिक वाचा...

एलिफंटा बोट दुर्घटनेची थरारक स्टोरी; दुर्घटनेतील मृतांची नावं समोर…

मुंबईः मुंबईतील गेटवे ऑफ इंडियावरुन एलिफंटाला जाणारी प्रवासी बोट बुडाल्याने आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांची नावे समोर आली आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. दोन्ही बोटींमध्ये प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसह एकूण 114 जण होते. यापैकी 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, पाच जणांचा शोध अद्याप सुरु आहे. 97 […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!