मनोज जरांगे यांच्या सभेची परवानगी पोलिसांनी नाकारली…
बीडः लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असल्याचे कारण देत बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे आयोजित मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी परवानगी नाकारल्याने याविरोधात संयोजकांनी थेट औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. परळी वैजनाथ येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मार्केट यार्डात जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज (बुधवार) सायंकाळी 6 वाजता बैठक बोलावली […]
अधिक वाचा...अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नीचा मोठा गौप्यस्फोट…
मुंबई : अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणी वडील विनोद घोसाळकर आणि तेजस्वी घोसाळकर यांनी पत्रकार परिषद घेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई, अरविंद सावंत, अनिल परबी उपस्थित होते. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांची काही दिवसांपूर्वी फेसबुक लाईव्ह सुरू असताना हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आता त्यांचे वडील […]
अधिक वाचा...भीषण अपघात! महादेवाची पिंड आणण्यासाठी निघाले अन् काळाने घातला घाला…
जळगावः जळगाव शहरापासून जवळच असलेल्या बांभोरी गावाजवळ आज (शुक्रवार) पहाटे पाच वाजता भाविकांच्या मोटारीला भीषण अपघात झाला आहे. महादेवाची पिंड आणण्यासाठी ओंकारेश्वर (मध्यप्रदेश) येथे जाण्यासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला असून तीन भाविक ठार झाले तर चौघे जखमी झाले आहेत. जळगाव शहरातील खोटे नगर परिसरात असलेल्या साईनगर भागात महादेवाचे मंदिर बांधण्याचे काम हाती घेण्यात येत […]
अधिक वाचा...नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली SIT स्थापन…
नाशिक : राज्यातील आरक्षण आंदोलनादरम्यान गेल्या काही महिन्यांत झालेल्या हिंसक बाबींची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एसआयटीची स्थापना केली आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. राज्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलने झाली. या आंदोलनांदरम्यान काही ठिकाणी हिंसक आंदोलने झाली. या हिंसक आंदोलनांमुळे राज्यातील सामाजिक सलोख्याला बाधा […]
अधिक वाचा...समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात दोघांचा मृत्यू…
छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावरील हर्सूल सावंगी गावाजवळ कार आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन जण जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होतं. त्यापैकी दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगर शहराजवळील हर्सूल सावंगी या ठिकाणी नागपूर कॉरिडॉर चैनल क्रमांक 436 जवळ अपघात झाला होता. अपघातात तीन जण गंभीर जखमी तर […]
अधिक वाचा...मनोज जरांगे पाटील यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल…
बीडः मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विना परवाना रॅली काढून जेसीबीने फुल उधळल्या प्रकरणी बीडमध्ये मनोज जरांगे पाटील आणि इतर 12 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील दहा दिवसांत जरांगे यांच्यावर हा तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्यावर आतापर्यंत […]
अधिक वाचा...राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून देऊ; नाशिक पोलिसांना धमकीचा फोन…
नाशिक : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत न्याय जोडो यात्रा लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार असून, राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. राहुल गांधी यांना त्यांचे वडील राजीव गांधी यांच्यासारखं बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी फोन कॉलद्वारे देण्यात आली होती. न्याय जोडो यात्रेदरम्यान हा हल्ला करणार असल्याचे आरोपीने फोनवर सांगितले. संबंधित फोनकॉलनंतर […]
अधिक वाचा...पुनित बालन यांच्या वतीने पुणे पोलिस कल्याण निधीला ५ लाख रुपयांची देणगी…
पुनित बालन ग्रुप प्रेझेंट्स ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा साई पॉवर हिटर्स संघाला विजेतेपद !! पुणे (संदिप कद्रे): पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथक आणि मीडिया यांच्या संघांचा समावेश असलेल्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत साई पॉवर हिटर्स संघाने शिवमुद्रा ब्लास्टर्स संघाचा ३७ धावांनी पराभव करून सलग दुसर्या वर्षी […]
अधिक वाचा...दुय्यम निबंधकाच्या घरात मिळाले मोठे घबाड…
छत्रपती संभाजीनगर: दुय्यम निबंधकाला लाच घेताना रंगेहात पकडले असून, त्यांच्या घरात तब्बल 1 कोटी 35 लाख रुपयांची रोख रक्कम मिळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. योगायोग म्हणजे बेकायदेशीर दस्त नोंदणी प्रकरणात या दुय्यम निबंधकाच्या निलंबनाचे आदेश सकाळी सिल्लोड कार्यालयात धडकले, त्याची अंमलबजावणी होण्यापर्वीच लाच घेताना त्याला रंगेहात पकडण्यात आले. छगन उत्तमराव पाटील असे या अधिकाऱ्याचे नाव […]
अधिक वाचा...मनोज जरांगे यांचे सहकारी पोलिसांच्या ताब्यात; संचारबंदी, बस पेटवली, इंटरनेट बंद…
जालना : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रविवारी मध्यरात्री पासून ही संचारबंदी लागू केली गेली आहे. जरांगे पाटील यांनी मुंबईला जाण्याच्या इशाऱ्यानंतर मोठ्या प्रमाणात आंदोलक जमा होणार आहे. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने अंबड तालुक्यात संचारबंदी लागू केली आहे. घनसावंगी […]
अधिक वाचा...
