कडाक्याच्या थंडीमुळे रुम हिटर लावला अन् 6 जणांचा होरपळून मृत्यू…

नवी दिल्ली : राजधानीत कडाक्याच्या थंडीमुळे रात्रीच्या वेळी घरात हिटर लावला आणि कुटुंब झोपेत असतानाच घराला आग लागली. या घटनेत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, संपूर्ण कुटूंब उद्धवस्त झाले आहे. मृतांमध्ये २ पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. दिल्लीच्या पीतमपुरा भागात ही घटना घडली आहे. एका व्यापाऱ्याच्या घरातील वरच्या मजल्यावर शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! वहिनीचे दिरासोबत प्रेमसंबंध; तीन चिमुकले अन् पोलिस…

लखनौ (उत्तर प्रदेश): तीन मुलांची आई असलेली वहिनी आणि दिराचे प्रेमसंबंध होते. घरातून मुलांसह दोघांनी पळ काढला. पुढे त्यांनी लहान चिमुकल्यांना थंडीत जंगलाजवळ सोडले आणि तिथून पळून गेले. पोलिसांना थंडीमध्ये चिमुकले कुडकुडताना दिसल्यावर चौकीत आणले आणि त्यांना उबदार कपडे दिली. पुढे नातेवाईकांच्या ताब्यात दिले. पोलिसांच्या माणुसकीमुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. श्रावस्ती पोलिसांना रात्रीच्या वेळी […]

अधिक वाचा...

बापरे! स्कॉर्पिओमधून दोन डझन शेळ्यांची चोरी; ओरडू नये म्हणून….

पाटणा (बिहार) : एका स्कॉर्पिओ मोटारीला अपघात झाला होता. मोटारीजवळ जाऊन पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला. कारण, स्कॉर्पिओमध्ये तब्बल दोन डझन शेळ्या कोंबल्या होत्या तर त्या ओरडू नये म्हणून त्यांच्या तोंड चिकटपट्टीने बंद करण्यात आले होते. या घटनेनंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. बिहारच्या छपराजवळ असलेल्या हनुमानगंज गावात चोरांनी अपघातग्रस्त स्कॉर्पिओ […]

अधिक वाचा...

सहलीची नाव उलटून १२ विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांचा मृत्यू…

वडोदरा (गुजरात) : वडोदरामध्ये सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांची बोट तलावात उलटून झालेल्या भीषण दुर्घटनेत १२ विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. हरणी तलावात बोट उलटली. या बोटमध्ये 23 विद्यार्थी आणि चार शिक्षक होते. सर्व विद्यार्थी वडोदरा येथील एका शाळेतील आहेत. बचावकार्यात 13 मुलं आणि दोन शिक्षकांना वाचवण्यात यश आले आहे. पाण्यातून वाचविण्यातून आलेल्या नऊ ते दहा […]

अधिक वाचा...

पत्नी पाचव्यांदा लग्न करत समजल्यावर चौथ्या पतीने उचलले मोठे पाऊल…

भोपाळ (मध्य प्रदेश) : इंदूरमध्ये पत्नीसोबत झालेल्या वादानंतर स्वत:ला पेटवून घेतलेल्या सुनील लोहानी (वय 35) या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पत्नीच्या पाचव्या लग्नावरुन आपल्या पत्नीशी वाद झाला आणि त्यामुळेच त्याने हे पाऊल उचलले, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिस अधिकारी शैलेंद्र सिंह जादोने यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मृत सुनील लोहानी महिलेचा चौथा पती होता. महिलेने 2018 […]

अधिक वाचा...

मॉडेल दिव्या पाहुजा हिचा मृतदेह दहा दिवसानंतर आढळला…

चंदीगड (हरियाणा) : मॉडेल दिव्या पाहुजा हिचा मृतदेह दहा दिवसानंतर आढळला आहे. पोलिसांनी एका कालव्यातून मृतदेह बाहेर काढल्यानंतर फोटो दिव्याच्या कुटुंबीयांना पाठवला, ते पाहून त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली आहे. मॉडेल दिव्या पाहुजा हिचा 2 जानेवारी रोजी गुरुग्राममधील सिटी पॉइंट हॉटेलच्या रूम नंबर 111 मध्ये गोळ्या झाडून हत्या केली होती. हॉटेल मालक अभिजीत सिंग याने त्यांचे […]

अधिक वाचा...

विवाहीत युवकावर तिघांनी शेतामध्ये केला सामुहिक बलात्कार…

लखनौ (उत्तर प्रदेश): राज्यातील संभलमध्ये एका विवाहित युवकावर गावातील तीन युवकांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवाय, त्यांनी संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या प्रकरणी कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका आरोपीला अटक करण्यात आली असून, दोघांचा शोध सुरू आहे. रजपुरा पोलिस स्टेशन परिसरात ही घटना […]

अधिक वाचा...

सैराटची पुनारवृत्ती! प्रेमविवाहानंतर बाप आणि भाऊ चिडला अन्…

पाटणा (बिहार) : मुलीने वडिलांच्या मनाविरुद्ध पळून जाऊन प्रेमविवाह केल्यामुळे चिडलेल्या बापाने आणि भावाने लग्नाच्या 3 वर्षांनंतर संपूर्ण कुटुंबाचा जीव घेतला. या घटनेत तिघांना जीव गमवावा लागला आहे. ऑनर किलिंगची घटना घडली असून, या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातल्या गोपालपूर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या नवटोलिया गावात मंगळवारी […]

अधिक वाचा...

कंपनीची सीईओ असलेल्या आईने केला चिमुकल्याचा खून; कारण…

पणजी (गोवा): एका स्टार्टअप कंपनीची सीईओ असलेल्या सूचना सेठ या महिलेने स्वतःच्या चार वर्षांच्या चिमुकल्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बंगळुरूतून ती गोव्यात आली होती. गोव्यात हत्या केल्यानंतर बंगळुरूला मुलाचा मृतदेह बॅगेत भरून कॅबने जात असताना तिला अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. सूचना सेठ ही महिला एका स्टार्टअप कंपनीची मुख्य […]

अधिक वाचा...

प्रेमविवाहानंतर गावातील युवकासोबत सुरू झाले प्रेमसंबंध अन् पुढे…

पाटणा (बिहार): प्रेमविवाह झाल्यानंतर गावातील एका युवकाच्या प्रेमात महिला पडली होती. शिवाय, तिला रिल्स बनविण्याची आवड होती. पतीने रिल्स बनविण्यापासून रोखल्यामुळे पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृत महेश्वर राय याची पत्नी राणी आणि तिच्या प्रियकरासह २ साथीदारांना अटक केली आहे. महेश्वर आणि राणी या दोघांचा ६-७ वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. प्रेमविवाहानंतर […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!