गुवाहाटीच्या कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी मराठी पोलिस अधिकाऱ्याकडे…
आसाम : महाराष्ट्रात शिवसेनेत फूट पाडून 40 बंडखोर आमदारांना सोबत घेऊन शिवसेना नेते एकनाथ शिंदे ज्यावेळी गुवाहाटीत पोहचले त्यावेळी तेथील कायदा – सुव्यवस्था पाहण्याची जबाबदारी एका मराठी पोलिस अधिकाऱ्यावरच होती. ते अधिकारी म्हणजे सहायक पोलिस महानिरीक्षक डॉ. धनंजय घनवट. ते मुळचे बारामती येथील रहिवासी आहेत. डॉ. धनंजय घनवट हे आसाम पोलिस दलात सहायक पोलिस महानिरीक्षक […]
अधिक वाचा...महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निविराला वीरमरण…
बुलढाणा: महाराष्ट्राच्या अग्निविराला सियाचिनमध्ये कर्तव्य बजावताना वीरमरण आले आहे. अक्षय गवते असे वीरमरण आलेल्या जवानाचे नाव आहे. सियाचिनमधील ग्लेशियरवर कर्तव्य बजावताना प्रकृती ढासळल्याने अक्षय गवते यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे प्राणज्योत मालवली. जवान अक्षय गवते हे बुलडाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथील राहणारे आहेत. सियाचिनमध्ये […]
अधिक वाचा...लेहमध्ये झालेल्या दुर्घटनेत सातारचा जवान हुतात्मा…
सातारा: भारतीय सैन्य दलाच्या जवानांना लेह येथे बर्फामध्ये झालेल्या दुर्घटनेत सातारा जिल्ह्यातील जवान शंकर बसाप्पा उकलीकर (रा. वसंतगड तालुका कराड) हे हुतात्मा झाले आहेत. या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. शंकर उकलीकर हे सैन्य दलात नायब सुभेदार पदावर कार्यरत होते. त्यांचे पार्थिव वसंतगड या गावी गुरुवारी (ता. १२) येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 2001 साली […]
अधिक वाचा...जवान पांडुरंग तावरे यांना 12 वर्षीय मुलाने दिला मुखाग्नी…
बीड : सिक्कीममधील ढगफुटीत बेपत्ता झालेले जवान पांडुरंग तावरे हुतात्मा झाले आहेत. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी काकड हिरा (जि. बीड) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पांडुरंग तावरे यांच्या मेघराज नव्याच्या 12 वर्षीय मुलाने त्यांना मुखाग्नी दिला. सिक्कीममधील गंगटोक परिसरात मंगळवारी (ता. 3) ढगफुटी झाल्यानंतर तिस्ता नदीला पूर आला होता. यामध्ये भारतीय सैन्यातील 23 […]
अधिक वाचा...Video: पोलिसाने पळत जाऊन घातली चोरट्यांच्या दुचाकीला लाथ…
नवी दिल्लीः एका पोलिसाने पळत जाऊन लाथ मारून स्कूटरवरून पळणाऱ्या दोन चोरांना पकडले आहे. सोमवारी सायंकाळी मॉडेल टाऊन मार्केट परिसरात पर्स हिसकावून दोन चोर वेगाने पळत असताना ही घटना घडली. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पोलिसावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दिल्ली पोलिसांच्या संपर्क शाखेतील सहाय्यक उपनिरीक्षक अजय झा […]
अधिक वाचा...IPS अधिकाऱ्याचे कौतुक! पहिल्या पगाराचे काय केले पाहा….
हैदराबाद : हैदराबादमध्ये आयपीएस प्रशिक्षण घेत असलेल्या बाडमेरचे आयपीएस अधिकारी आशीष पूनिया यांनी ऑगस्ट महिन्यातील आपला पहिला पगार बाडमेरच्या 50 विलेजर्स या संस्थेला दान दिला आहे. आशीष पूनिया यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. आशिष पुनिया यांनी ऑगस्ट महिन्यातील आपला पहिला पगार बाडमेरच्या 50 विलेजर्स या संस्थेला दान दिला. याबाबत त्यांनी लिहिले की, ‘भरत जी सर […]
अधिक वाचा...जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत कर्नल, मेजर, पोलीस अधिकारी आणि श्वान हुतात्मा…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातल्या कोकेरनाग भागामध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराचे कर्नल, मेजर, जम्मू-काश्मीरचे पोलीस उपाधिक्षक आणि केंट नावाचा श्वान हुतात्मा झाला आहे. कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धोनॅक आणि जम्मू काश्मीरचे पोलील उपाधिक्षक हुमायून भट अशी हुतात्मा झालेल्यांची नावे आहेत. गाडोले भागात लपलेल्या दहशतवाद्यांमध्ये आणि सुरक्षा बलामध्ये जोरदार चकमक सुरू झाली होती. […]
अधिक वाचा...महाराष्ट्राचा सुपुत्र आकाश अढागळे लेहमध्ये हुतात्मा…
वाशिम : महाराष्ट्राचा सुपुत्र आणि वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन गावचे जवान आकाश काकाराव अढागळे वीरमरण आले आहे. 6 सप्टेंबर रोजी काश्मीरच्या लेह भागात कर्तव्य बजावत असताना हिमस्खलन होऊन त्यांचा उंच डोंगरावरून 1 हजार फुटाहुन अधिक खोल दरीत पडून अपघात झाला. या अपघातामध्ये डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांच्यावर लष्करी इस्पितळात औषधोपचार सुरू होते. मात्र, रविवारी (ता. […]
अधिक वाचा...पाचव्या प्रयत्नात IPS! ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये जिंकले होते एक कोटी…
नवी दिल्ली : देशातील अनेक युवक-युवती UPSC ची परीक्षा देऊन IAS, IPS होण्याचे स्वप्न पाहतात. यामध्ये काही जणांना यश येत असते तर काही जणांना अपयश. पण, अपयश ही यशाची पहिली पायरी समजली जाते. हिमाचल प्रदेशात असलेल्या मोहिता शर्मा यांनी पाचव्या प्रयत्नात UPSC परीक्षेत यश मिळवले होते. शिवाय, त्यांनी ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये एक कोटी रुपये जिंकले […]
अधिक वाचा...लडाखमध्ये महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण; पाहा नऊ जणांची नावे…
सातारा : लडाखमध्ये भारतीय लष्कराच्या वाहनाला शनिवारी (ता. १९) सायंकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात भारतीय लष्कराच्या नऊ जवानांना वीरमरण आले असून, यामध्ये महाराष्ट्राचा सुपुत्र वैभव भोईटे हे हुतात्मा झाले आहेत. हुतात्मा झालेल्यांमध्ये एक ज्यूनिअर कमीशन्ड ऑफिसर आणि ८ जवानांचा समावेश आहे. लेहहून न्योमाच्या दिशेने जाताना लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात झाला होता. लडाखच्या न्योमा जिल्ह्यातल्या […]
अधिक वाचा...
