ललित पाटील नेमका पळाला कसा? याची होणार चौकशी…

पुणे: ड्रग माफिया ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चार सदस्यीय समिती गठीत करण्याचा निर्णय राज्याचे उपसचिव प्रकाश सुरवसे यांनी घेतला आहे. या समितीला 15 दिवसांमध्ये त्यांचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. राज्य सरकारच्या या चौकशी समितीत राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सोलापूरच्या शासकीय महाविद्यालयाचे […]

अधिक वाचा...

लेहमध्ये झालेल्या दुर्घटनेत सातारचा जवान हुतात्मा…

सातारा: भारतीय सैन्य दलाच्या जवानांना लेह येथे बर्फामध्ये झालेल्या दुर्घटनेत सातारा जिल्ह्यातील जवान शंकर बसाप्पा उकलीकर (रा. वसंतगड तालुका कराड) हे हुतात्मा झाले आहेत. या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. शंकर उकलीकर हे सैन्य दलात नायब सुभेदार पदावर कार्यरत होते. त्यांचे पार्थिव वसंतगड या गावी गुरुवारी (ता. १२) येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 2001 साली […]

अधिक वाचा...

ललित पाटील याला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी मंत्र्याचा फोन…

मुंबई : फरारी ड्रग्ज माफिया ललित पाटील याला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी राज्याचे मंत्री दादा भुसे यांचा फोन गेला होता, त्यांचे कॉल रेकॉर्ड चेक करा असा थेट आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. पुण्यातील आमदार रविंद्र धंगेकर यांनीही ललित पाटील याच्या पळण्यामागे राज्यातील मंत्र्याचा हात असल्याचा आरोप केला होता. ललित पाटील हा काही […]

अधिक वाचा...

जवान पांडुरंग तावरे यांना 12 वर्षीय मुलाने दिला मुखाग्नी…

बीड : सिक्कीममधील ढगफुटीत बेपत्ता झालेले जवान पांडुरंग तावरे हुतात्मा झाले आहेत. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी काकड हिरा (जि. बीड) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पांडुरंग तावरे यांच्या मेघराज नव्याच्या 12 वर्षीय मुलाने त्यांना मुखाग्नी दिला. सिक्कीममधील गंगटोक परिसरात मंगळवारी (ता. 3) ढगफुटी झाल्यानंतर तिस्ता नदीला पूर आला होता. यामध्ये भारतीय सैन्यातील 23 […]

अधिक वाचा...

मुंबईमध्ये इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग; सात जणांचा होरपळून मृत्यू…

मुंबई : गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या भीषण आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, 40 जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले असून, सध्या कुलिंगचं काम सुरु आहे. आगीचे कारण अद्याप समोर आले आहे. स्थानिक पोलीस आणि अग्निशमन […]

अधिक वाचा...

समृद्धी महामार्ग पुढील काही दिवसांसाठी राहणार बंद; कारण…

पुणे: समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रिड ट्रान्समीशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार असल्यामुळे जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दोन्ही बाजूंची वाहतुक 10 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर दरम्यान दुपारी 12 ते साडेतीन वाजेपर्यंत बंद राहणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 25 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर दरम्यान दुपारी 12 ते 3 यावेळात बंद राहणार आहे, असे महाराष्ट्र राज्य […]

अधिक वाचा...

Video: शौचालय साफ करायला लावल्याप्रकरणी खासदारावर गुन्हा दाखल…

नांदेड : नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूनंतर खासदार हेमंत पाटील यांनी डीन डॉ. एस. आर. वाकोडे यांना शौचालय साफ करायला लावले होते. वाकोडे यांनी हेमंत पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूनंतर शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाला भेट दिली होती. यावेळी रुग्णालयातील अस्वच्छता पाहून संतापलेल्या हेमंत पाटील […]

अधिक वाचा...

शिक्षकाने स्वतःच्या जागी ठेवला रोजंदारीवर निवृत्त शिक्षक; वर्गातच जुगार…

पालघर : तलासरी तालुक्यातील सूत्रकार डोंगरपाडा या जिल्हा परिषद शाळेतील एक धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. एका शिक्षकाने स्वतःच्या जागी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी रोजंदारीवर निवृत्त शिक्षकाला ठेवल्याचाही प्रकार घडला आहे. शाळेत मुलांना शिकवायला शासनाचा गलेलठ्ठ पगार घ्यायचा पण शाळेत न जाता मुलांना शिकवायला मजुरीवर शिक्षक ठेवायचा, असा प्रकार तलासरी तालुक्यात उघड झाला आहे. […]

अधिक वाचा...

मुंबईमधील अनंत चतुर्दशीला कोणते रस्ते राहणार बंद; पाहा यादी…

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील विसर्जनाच्या दिवशी (ता. 28) महत्त्वाचे रस्ते बंद करण्यात आले असून, विसर्जनानिमित्त मुंबईतील पोलिस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. अनंत चतुर्दशीनिमित्त मुंबई पोलिसांच्या वैद्यकीय रजा वगळता इतर सर्व रजा रद्द करण्यात आल्या आहे. चौपाट्या, तलाव याा ठिकाणी पालिकेने विसर्जनाची चोख तयारी ठेवली आहे. मुंबई शहरातील मुख्य विसर्जन मिरवणूक गुरुवारी […]

अधिक वाचा...

जेजुरीवरून परतताना रिक्षा पडली विहिरीत; नवविवाहीत दाम्पत्यासह मुलीचा मृत्यू…

पुणे: विवाहानंतर जेजुरी देवदर्शनासाठी व कुलाचार करण्यासाठी आलेल्या कुटुंबाची रिक्षा पुणे-पंढरपूर महामार्गावर सासवडजवळ असलेल्या बोरावके मळा येथील वळणावरील एका विहिरीमध्ये पडल्यामुळे नवदाम्पत्यासह एका मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. रोहित विलास शेलार (वय २३), वैष्णवी रोहित शेलार (वय १८), श्रावणी संदीप शेलार (वय १७) यांचा जागेवर दुर्दैवी मृत्यू […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!