पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार; भारताकडून चोख प्रत्युत्तर…
श्रीनगर (जम्मू-काश्मीर): पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील सीमेवर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. भारताने पाकिस्तानवर दबाव वाढवण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. एलओसीवर पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला असून, भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून कुरापती सुरूच आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) अनेक पाकिस्तानी चौक्यांवर रात्रीच्या सुमारास गोळीबार सुरू होता. […]
अधिक वाचा...भारत-पाक बॉर्डर! भारतीय जवानाला पाकिस्तान रेंजर्सने घेतले ताब्यात…
नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वच स्तरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दहशतवादी हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारताकडून तयारी सुरू असताना भारत पाकिस्तान सीमेवर एक जवान अचानक सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये गेला आहे. या जवानाना पाकच्या सैन्याने ताब्यात घेतले आहे. फिरोजपूर स्थित सीमारेषेवरील ही घटना घडली आहे. भारत-पाकिस्तान बॉर्डरवरील फिरोजपूर स्थित झिरो लाईन पार करुन बीएसएफचा […]
अधिक वाचा...Pahalgam Terror Attack! दहशतवाद्यांनी पँट काढायला सांगितली अन् झाडल्या गोळ्या; पाहा मृतांची नावे…
श्रीनगर (जम्मू काश्मीर): पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला तर 13 जण जखमी झाले आहेत. पहलगाममध्ये पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी देशीविदेशी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तेथे फिरायला गेलेल्या पर्यटकांबाबत हृदय पिळवटून टाकणारी माहिती समोर येत आहे. दहशतवाद्यांनी गोळी झाडण्यापूर्वी कोणत्या धर्माचे आहेत, अशी विचारणा केली. तसेच काही पर्यटकांना […]
अधिक वाचा...Pahalgam Attack Video! काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव विचारून थेट गोळ्या झाडल्या…
श्रीनगर: जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू तर १२ पर्यटक आणि २ स्थानिक नागरिक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी तातडीने संपूर्ण परिसर घेरून दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे. दक्षिण काश्मीरमधील पहलगाम भागात ही घटना घडली आहे. सुरक्षा दलांनी सर्व जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले आहे. संपूर्ण परिसराला वेढा […]
अधिक वाचा...महाराष्ट्राच्या जवानाला वीरमरण; वाहन कोसळले ८०० फूट खोल दरीत…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ मलकापूर येथील जवान सुनिल विठ्ठल गुजर (वय २७) यांना वीरमरण आले आहे. 2019 साली सुनिल विठ्ठल गुजर हे भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. सुनिल गुजर यांच्या मागे आई, वडील, पत्नी आणि सहा महिन्यांचा मुलगा तसेच भाऊ असा परिवार आहे. सुनिल गुजर यांनी पुण्यातील बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये […]
अधिक वाचा...भारतीय लष्कराच्या अग्निवीर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; पाहा महत्त्वाचे नियम…
नवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या अग्निवीर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, उमेदवार 12 मार्च ते 10 एप्रिलदरम्यान www.joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतात. अग्निवीर जनरल ड्युटी (GD), टेक्निकल, क्लर्क, स्टोअर कीपर टेक्निकल, ट्रेडसमॅन, सैनिक फार्मा, सैनिक टेक्निकल नर्सिंग असिस्टंट आणि महिला लष्करी पोलिसांच्या पदांसाठी ही भरती होणार आहे. तसेच, हवालदार एज्युकेशन, हवालदार […]
अधिक वाचा...रील स्टार मुलाचा माजी सैनिक असलेल्या बापाने केला खून अन्…
जळगाव : रील स्टार म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या मुलगा दारु पिऊन सातत्याने कुटुंबियांना मारहाण करत असल्यामुळे त्रासलेल्या माजी सैनिक असलेल्या बापाने आणि त्याच्या भावाने मिळून त्याची गळा दाबून हत्या केली. रील स्टार विकी पाटील याच्या हत्येनंतर त्याचे वडील विठ्ठल पाटील यांनीही गळफास घेऊन आत्महत्या केल्याने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे […]
अधिक वाचा...पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली भारतीय जवानाला अटक…
चंदीगड (पंजाब): पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी भारतीय लष्कराच्या जवानाला पंजाब पोलिसांनी केली आहे. नाशिक आर्मी कँटान्मेंटमध्ये तैनात असताना पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. आरोपी जवान हा नाशिकमधील भारतीय लष्कराच्या कँटान्मेंटमध्ये तैनात होता. संदीप सिंह असे हेरगिरी करणाऱ्या जवानाचे नाव आहे. संदीप सिंह याने आयएसआयला नाशिक, जम्मू […]
अधिक वाचा...Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)
स्वातंत्र्योत्तर काळापासून भारताची पश्चिम सीमा कायमच तणावाखाली असते. जवळजवळ रोजच या सीमेवर पाकिस्तानी रेंजर्स गोळीबार आणि उखळी तोफांचा भडीमार करत असतात. अर्थात भारताकडूनही त्यांच्या या आगळीकीला चोख प्रत्युत्तर देण्यात येतं. पाकिस्तानातल्या वेगवेगळ्या जहालमतवादी संघटनांचे दहशतवादी मिळेल त्या मार्गानं घातपात करण्याच्या उद्देशानं भारतात लपतछपत घुसखोरी करत असतात. भारतीय लष्कराची ही कायमची डोकेदुखी बनली आहे. तथापि, ही […]
अधिक वाचा...माजी सैनिकाने पत्नीची हत्या करून तुकडे केले अन् कुकरमध्ये शिजवले…
हैदराबाद: माजी सैनिकाने पत्नीची हत्या करून तिचे शरीराचे तुकडे केले आणि तुकड्यांना प्रेशर कुकरमध्ये शिजवले आणि त्यानंतर तलावात फेकून दिल्याची धक्कादायक घटना जिलेलगुडा भागात घडली आहे. गुरुमूर्ती असे आरोपीचे नाव असून त्याने पत्नी पुट्टवेंकटा माधवी (वय 35) हिचा हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. मीरपेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. मृत पुट्टवेंकटा माधवीच्या आईने तक्रार […]
अधिक वाचा...
