Video: कंबलवाले बाबांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करा; कारवाईची मागणी…
मुंबई : मुंबईत सध्या कंबलवाल्या बाबाची जोरदार चर्चा सुरू असून, व्हिडिओ सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. महिलांना नको तिथं हात लावत आहे. हे गंभीर आहे. त्यामुळे विनयभंगाचा देखील गुन्हा व्हायला हवा, असे विद्या चव्हाण यांनी म्हटले आहे. कंबलवाले बाबा विकलांग रुग्णांच्या अंगावर रग किंवा घोंगडी टाकून त्यांच्यावर उपचार करुन त्यांना ठणठणीत बरं करत असल्याचा […]
अधिक वाचा...संतापजनक! बापाने चिमुकलीच्या तोंडात तंबाखू देऊन केली हत्या…
जळगाव : तीन मुलींच्या पाठीवर तिसरीही मुलगीच झाल्यामुळे संतप्त झालेल्या जन्मदात्या बापाने आपल्या आठ दिवसांच्या मुलीच्या तोंडात तंबाखू कोंबून तिची हत्या केल्याची धक्कदायक घटना जामनेर तालुक्यातील वाकोदजवळ हरिनगर तांडा येथे उघडकीस आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ माजली आहे. गोकुळ गोटीराम जाधव (वय ३०) असे या आरोपी बापाचे नाव आहे. मुलीची हत्या केल्यानंतर […]
अधिक वाचा...पोलिसकाकाचे लग्नाचे वय आणि चांगल्या स्थळाच्या सुट्टीचा अर्ज व्हायरल…
लखनौ (उत्तर प्रदेश): फारुखाबाद जिल्ह्यातील एका कॉन्स्टेबल राघव चतुर्वेदी यांचे रजेचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. पत्रात रजा घेण्याचे कारण नमूद केले असून लग्नाचं वय निघून जात असल्याचे म्हटले आहे. पण, यापूर्वी सुद्धा अशी पत्र व्हायरल झाली होती आणि ती कोणीतर खोडसर पणाने व्हायरल केल्याचे पुढे आले होते. मोठ्या कष्टाने चांगलं स्थळ आले आहे. […]
अधिक वाचा...कॉलेजमधील मित्राने जबरदस्तीने अपहरण करून केला बलात्कार…
पुणे: युवतीचे जबरदस्तीने अपहरण करुन तिला पनवेल, बाणेर येथे नऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी युवतीने (वय १९) लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तबरेज शेख (वय १९, रा. शिवाजी मार्केटजवळ, कॅम्प) याला अटक केली आहे. हा प्रकार पनवेल व बाणेर येथे ५ ते ७ सप्टेबर दरम्यान घडला. पोलिसांनी […]
अधिक वाचा...प्रेमी युगुलाने आत्महत्येसाठी निवडली हॉटेलमधील रूम नंबर 305ची खोली…
छत्रपती संभाजीनगर : शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये प्रेमी युगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश सुरेश राऊत आणि दिपाली अशोक मरकड (दोघेही रा. बिडकीन) असे प्रेमीयुगूलाची नावे आहेत. शहरातील पंचवटी हॉटेलमध्ये दोघे थांबले होते. रूम नंबर 305 मध्ये दोघांनी गळफास घेऊन आयुष्य संपवले. […]
अधिक वाचा...युवतीने कमी उंचीमुळे घेतला जगाचा निरोप…
औरंगाबाद : एका युवतीने कमी उंची असल्याच्या तणावातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. 4) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास उघडकीस आला आहे. अर्चना विजयकुमार यादव (वय 23) असे आत्महत्या करणाऱ्या युवतीचे नाव आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यादव (मूळ रा. उत्तर प्रदेश) कुटुंब 20 वर्षांपासून औरंगाबाद शहरातील साताऱ्यात वास्तव्यास आहेत. अर्चनाचे वडील विजयकुमार यांचा फरशीचा व्यवसाय […]
अधिक वाचा...ज्येष्ठ साहित्यिक श्रावण गिरी यांचा रस्ता ओलंडताना अपघाती मृत्यू…
बीडः ज्येष्ठ साहित्यिक आणि निवेदक असलेले प्राध्यापक श्रावण गिरी यांचा रस्ता ओलांडनाता एका ट्रॅव्हल्सखाली येऊन मृत्यू झाला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. श्रावण गिरी हे कर्जत येथील एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रूजू होते. काही कामानिमित्त ते औरंगाबादला आले होते. काम आटोपून कर्जतला परतताना छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका ट्रॅव्हल्सच्या बसने त्यांना धडक दिली. […]
अधिक वाचा...लष्करी अधिकारी म्हणून वावरणारा पुणे रेल्वे स्थानकावर जेरबंद…
पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर लष्करी अधिकारी म्हणून वावरत असलेल्या युवकाला पकडण्यात आले आहे. लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला तो सुरक्षा पासशिवाय प्रवेश करून सहभागी झाला होता आणि लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्याने फोटोही काढल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे. भारतीय लष्कराच्या मिलिटरी इंटेलिजन्स (MI) दक्षिण कमांडकडून मिळालेल्या माहितीवरून, नीरज विक्रम विश्वकर्मा (वय 20, रा. उत्तर प्रदेश) […]
अधिक वाचा...पत्नीची हत्या केली अन् नवऱ्याला आला हृदयविकाराचा झटका…
ठाणे : एका व्यक्तीने पत्नीची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर आरोपी नवऱ्याचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना कळवा येथे घडली आहे. गोळीबाराचा आवाज ऐकून शेजारी राहणारे थेट साळवी यांच्या घराकडे धावले होते. पण, तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता. दिलीप साळवी आणि त्यांची पत्नी प्रमिला साळवी अशी मृतांची नावे आहेत. कुंभार आळी परिसरातील नागरिक साळवी यांच्या घरी […]
अधिक वाचा...मच्छिमाराला रात्रीच्यावेळी मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला अन्…
पनवेल : एक युवती मोबाईल जास्त वेळ वापरते म्हणून कुटुंबिय ओरडले होते. घर सोडून गेलेल्या युवतीने समुद्रात उडी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रियंका तांडेल (वय 20, रा. कासारभाट, ता. पनवेल) असे मृत युवतीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका जास्त वेळ मोबाईल वापरते म्हणून घरातील […]
अधिक वाचा...
