मुंबईत पोलिस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या…
मुंबई: मुंबईच्या विक्रोळी परिसरात एका पोलिस कर्मचाऱ्याने राहत्या घरात लोखंडी जिन्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी घडली. शंकर कोळसे (वय ५६) असे आत्महत्या करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायाच्या जुन्या दुखण्याला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलले असावे. शंकर कोळसे हे त्यांची पत्नी रंजना यांच्यासोबत विक्रोळी पार्कसाईटमधील वर्षानगर येथे राहत […]
अधिक वाचा...मुंबई पोलिस दलातील शिपाई यांचा लष्करातील जवानांप्रमाणे होणार सन्मान…
मुंबई: भारतीय लष्करामध्ये पदोन्नती मिळाल्यानंतर प्रत्येक जवानांचा सन्मान केला जातो. हीच प्रथा आता मुंबई पोलिस दलात सुरू केली जाणार आहे. तसेच मुंबई पोलिस दलातील पदोन्नती मिळालेल्या अधिकारी, अंमलदारांचा बँड पथकाच्या संचलनाद्वारे (पिपिंग सेरेमनी) सन्मान करा, असा आदेश मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी सर्व वरिष्ठ अधिकार्यांना दिला आहे. फक्त पोलिसांसाठी! ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!’ […]
अधिक वाचा...India Vs Pakistan War : मुंबईत पोलिसांनी घेतला मोठा निर्णय…
मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप पर्यटकांचा बदला घेण्यासाठी आणि दहशतवाद्यांना अद्दल घडवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पीओके आणि पाकमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला करत 100 दहशतवाद्यांना ठार केले. भारत-पाकमधील तणाव वाढला असून, दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले सुरू आहेत. भारत-पाकिस्तानमध्ये जोरदार चकमक सुरू असून, भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले हाणून पाडले आहेत. पाकिस्तानकडून […]
अधिक वाचा...मुंबई पोलिस आयुक्तपदी देवेन भारती यांची निवड…
मुंबईः मुंबई पोलिस आयुक्तपदी IPS देवेन भारती यांची निवड करण्यात आली आहे. विवेक फणसळकर आज (बुधवार) मुंबई पोलिस आयुक्तपदावरून निवृत्त झाले. त्यानंतर विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे मुंबईत पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून देवेन भारती यांची ओळख आहे. देवेन भारती मूळचे बिहारमधील दरभंगा येथील आहेत. त्यांनी […]
अधिक वाचा...मुंबई हल्ल्यातील हुतात्मा अंबादास पवार यांच्या पत्नीची DySP पदावर नियुक्ती…
मुंबई : मुंबईवर 26 नोहेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले पोलिस शिपाई अंबादास पवार यांच्या पत्नी श्रीमती कल्पना पवार यांना परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक पदी (DySP) नियुक्ती देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (मंगळवार) श्रीमती पवार यांना परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक पदावरील थेट नियुक्तीचे आदेश प्रदान केले. मुंबईत झालेल्या 26/11 च्या हल्ल्यामध्ये पोलिस दलात […]
अधिक वाचा...अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी…
मुंबईः अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा धमकी आली आहे. मुंबईच्या वरळी येथील वाहतूक विभागाच्या व्हॉट्सऍप नंबरवर सलमानसंदर्भातला धमकीचा मेसेज आला आहे. तसेच, याच मेसेजमध्ये सलमान खानला घरात घुसून मारण्याचीही धमकी देण्यात आली आहे. दरम्यान, सलमान खान धमकी प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. अभिनेता सलमान खान याला […]
अधिक वाचा...प्रसिद्ध अभिनेत्याला केली अटक; मानवी तस्करी प्रकरणाचा पर्दाफाश…
मुंबई : वेब सिरीज आणि आणि टीव्ही मालिकांमध्ये भूमिका साकारलेल्या एका प्रसिद्ध अभिनेत्याने 60 जणांची फसवणूक केली असून त्याला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी मोठ्या मानवी तस्करी प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. मनीष ग्रे उर्फ मॅडी असे त्याचे नाव असून, त्याला या टोळीचा मुख्य सूत्रधार (किंगपिन) म्हणून अटक करण्यात आली आहे. मानवी तस्करी प्रकरणात अभिनेता […]
अधिक वाचा...मुंबई पोलिस दलातील Psi सागर धुमाळ यांचे निधन
पुणे: मुंबई पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षक सागर विलास धुमाळ (वय ३२) यांचे सोमवारी (ता. ७) अल्पशा आजाराने वाशी येथील एमजीएम रुग्णालयात निधन झाले. सागर धुमाळ यांच्या निधनामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, पोलिस दलातही हळहळ व्यक्त केली जात आहे. सागर धुमाळ यांचे मुळ गाव पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपळे धुमाळ. शेतकरी कुटुंबातील त्यांना जन्म. गरिब […]
अधिक वाचा...मुंबई पोलिसांनी हत्येचा कट उधळला; बिश्नोई गँगच्या 5 जणांना अटक…
मुंबई : मुंबई पोलिसांनी बिश्नोई टोळीच्या गुंडांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मुंबईतील एका उद्योगपतीच्या हत्येसाठी बिष्णोई गँगचे शूटर्स मुंबईत आले होते. मात्र, मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने 5 आरोपींना अंधेरी येथून अटक केली आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर हल्ला केल्यानंतर पोलिसांनी बिश्नोई गँगच्या काही गुंडांना अटक केली होती. त्यानंतर राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या […]
अधिक वाचा...मुंबई पोलिसातील IPS डॉ. सुधाकर पठारे यांचे तेलंगणात अपघाती निधन…
मुंबई : आयपीएस अधिकारी आणि मुंबई पोलिस दलातील डीसीपी सुधाकर पठारे यांचे रस्ते अपघातामध्ये निधन झाले आहे. तेलंगणातील श्रीशैलम येथून पठारे नागरकुरलूकडे जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला. सुधाकर पठारे हे 2011 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. सुधाकर पठारे यांच्या अपघाती निधनामुळे महाराष्ट्र पोलिस दलामध्ये शोककळा पसरली आहे. सुधाकर पठारे यांचे पोस्टिंग सध्या मुंबई पोलीस […]
अधिक वाचा...
