हृदयद्रावक! जळगावमध्ये तीन मुलांचा धरणात बुडून मृत्यू…
जळगाव: जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील भोकरबारी धरणाजवळ असलेल्या पीर बाबाचे दर्शन घेऊन पाण्यात खेळण्यासाठी उतरलेल्या तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पारोळा शहरातील बडा मोहल्ला परिसरात राहत असलेले पाच किशोरवयीन मुले पारोळा शहरापासून चार किमी अंतरावर असलेल्या भोकरबारी धरणाच्या किनारी असलेल्या पीर बाबाच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! उच्चशिक्षित युवकाने घेतला जगाचा निरोप; सुसाईड नोटमध्ये भावनिक…
जळगाव : अयोध्या नगर येथील नीलेश सुरेश सोनवणे (वय २५) या युवकाने नोकरी मिळत नसल्याने नैराश्यातून घरी कोणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने सुसाईड नोट लिहून ठेवली असून त्यात आत्महत्येचे कारण लिहिण्यासह ‘पप्पा, मम्मी तुम्ही मला खूप प्रेम दिले, प्लीज मला माफ करा मी तुम्हाला सोडून जातोय,’ असा भावनिक […]
अधिक वाचा...अनैतिक संबंध! प्रियकराने केली प्रेयसीची दगडाने ठेचून हत्या…
जळगाव : जामनेर तालुक्यात एकाने महिलेची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना आज (सोमवार) सकाळी शहापूर पुरा भाग येथे घडली आहे. महिलेची हत्या केल्यानतंर पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. संगीता पिराजी शिंदे (वय ३६, रा. शहापूर पुरा) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर किरण संजय कोळी उर्फ लहान्या असे खून करणाऱ्या […]
अधिक वाचा...चुलतभावासह दोन मित्रांनी केला विवाहित बहिणीवर अत्याचार…
जळगावः लग्नाच्या ठिकाणी कपडे बदलणाऱ्या चुलत बहिणीचे फोटो व व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत चुलतभावासह त्याच्या दोन मित्रांनी विवाहित बहिणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित धक्कादायक प्रकार ४ डिसेंबर २०२२ ते ६ जून २०२४ दरम्यान महिलेच्या घरी, जंगलात व धुळे जिल्ह्यात घडला. या त्रासाला कंटाळून महिलेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून […]
अधिक वाचा...वहिनीचे दिरासोबत प्रेमसंबंध अन् जीव गेला नवऱ्याचा…
जळगाव : प्रेम संबंधात अडथळा निर्माण होईल म्हणून पत्नीने दिराच्या मदतीने पतीचा ब्लेडच्या सहाय्याने पोटावर वार करून तसेच दगड डोक्यात टाकून खून केला. यानंतर अपघात वाटावा म्हणून मृतदेह कोदगाव शिवारात महामार्गावर टाकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी गुन्हा उघड केला असून, याप्रकरणी महिला व तिच्या चुलत दिराला अटक केली आहे. बाळू सिताराम पवार (रा. […]
अधिक वाचा...जळगाव जिल्ह्यात चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; जमाव संतप्त…
जळगाव: सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती कळताच जमावाने पोलिस स्टेशनवर मोर्चा काढत आरोपीला ताब्यात देण्याची मागणी पोलिसांच्याकडे केली होती. मात्र, पोलिसांनी आरोपीला सुरक्षित ठिकाणी हलवल्याचे कळताच जमाव प्रक्षुब्ध झाला आणि जामनेर पोलिस ठाण्यावर दगडफेक केली. या घटनेत मोठ्या प्रमाणात पोलिस कर्मचारी जखमी […]
अधिक वाचा...रशियात डॉक्टर होण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू…
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थी रशियामध्ये एमबीबीएस होण्यासाठे गेले असून, वोल्खोव्ह नदीच्या किनारी फेरफटका मारत होते. त्यावेळी लाट येऊन त्यांचा त्यात बुडून मृत्यू झाला आहे. ते यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये वैद्यकीय शाखेत शिकत होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रशिया येथील दुतावासातील कुमार गौरव (आय.एफ.एस ) यांच्याशी संपर्क करून सर्व माहिती घेतली. प्राथमिक माहितीनुसार, हर्षल […]
अधिक वाचा...भुसावळमध्ये माजी नगरसेवकासह दोघांची गोळ्या झाडून हत्या…
जळगाव : माजी नगरसेवकासह दोघांवर गोळीबार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. धावत्या गाडीवर केलेल्या गोळीबारात दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. माजी नगरसेवक संतोष बारसे आणि संतोष राखुंडे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. माजी नगरसेवक संतोष बारसे आणि संतोष राखुंडे हे कारमधून […]
अधिक वाचा...मामाच्या मुलीसाठी सख्ख्या भावांची हाणामारी; पण तिचं प्रेम…
जळगाव : भावाच्या मुलीला सून म्हणून घरात आणण्यासाठी महिलेनं आपल्या दोन्ही मुलांना घेऊन जामनेर येथील भावाच्या घरी गेली. मामाची मुलगी पसंत असल्याचे मोठ्या मुलाने सांगितले. पण, लहान भावाने सुद्धा आपल्यालाही मुलगी पसंत असल्याचे सांगितले. मी लग्न करेन तर तिच्याशीच, असे लहान भाऊ म्हटल्यानंतर दोन्ही भाऊ आपसात भिडले. एकमेकांचे कपडे फाटेपर्यंत हाणामारी केली. आत्याच्या दोन्ही भावांची […]
अधिक वाचा...MPSC स्पर्धा परीक्षेत 3 गुण कमी पडल्यामुळे युवकाची आत्महत्या…
जळगाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मंत्रालय क्लार्क परीक्षेचा निकाल जाहीर केला असून, यामध्ये अपयश आलेल्या युवकाने आत्महत्या केल्याची धक्क्दायक घटना शिरसोली येथे घडली आहे. आकाश भिमराव बारी (वय २५) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. तीन गुण कमी मिळाल्याने त्याने गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला आहे. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त […]
अधिक वाचा...
