उद्धव ठाकरे यांच्या खंद्या शिलेदाराने रुळावर झोपून संपवलं आयुष्य…

मुंबई : मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, माजी नगरसेवक सुधीर मोरे यांचा घाटकोपर रेल्वे स्टेशनजवळ रुळावर मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. मृतदेहाचे अनेक तुकडे झाले असून, त्यांनी लोकल ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या केल्याची माहिती पुढे येत आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. सुधीर मोरे यांचा मृतदेह रेल्वे रुळावर गुरुवारी […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! भावाला राखी बांधायला निघालेल्या बहिणीला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं…

पुणे : रक्षाबंधनानिमित्त भावाला राखी बांधायला निघालेल्या बहिणीला रस्त्यातच मृत्यूने गाठल्याची हृदयद्रावक घटना पुणे-पानशेत रस्त्यावर घडली आहे. संस्कृती प्रदीप पवार (वय १२) असे मृत बहिणीचे नाव आहे. ती पुण्यातील सिंहगड रोडवरील नांदेड सीटीजवळ राहत होती. पुणे शहरातील नांदेड सीटी परिसरात राहणारे प्रदीप पवार हे रक्षाबंधन सोहळ्यासाठी पत्नी अर्चना, मुलगा प्रद्युम्न, मुलगी संस्कृती आणि बहीण सुनीता […]

अधिक वाचा...

रक्षाबंधनाच्या दिवशीच भावाची अवस्था पाहून बहिणीने फोडला हंबरडा…

औरंगाबाद : रक्षाबंधनाच्या दिवशीच भावाने आपल्या बहिणीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बलुजा भागातील बजाजनगरात परिसरात घडली आहे. आकाश सर्जेराव शिंदे (वय 30, रा. खैरका, ता. मुखेड, जि नांदेड) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आकाश एका कंपनीत काम करत होता. दरम्यान तो औरंगाबाद येथे बहिणीच्याच घरी वास्तव्यास होता. तर, त्याची […]

अधिक वाचा...

आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल…

हिंगोली : शिंदे गटाचे आमदार आमदार संतोष बांगर यांनी हातात नंगी तलवार घेऊन सार्वजनिक ठिकाणी फिरवल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोलीत आयोजित करण्यात आलेल्या कावड यात्रेदरम्यान आमदार बांगर यांनी ही तलवार हातात घेऊन फिरवली होती. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आमदार संतोष बांगर हे नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्य आणि प्रकरणामुळे […]

अधिक वाचा...

नम्रताच्या अकाली निधनामुळे गावावर पसरली शोककळा…

जालना: नळाचं पाणी भरत असताना विजेचा धक्का लागून विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भोकरदन शहरात घडली आहे. नम्रता संदीप सुरडकर असे या मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. नम्रताच्या अकाली मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. नळाला आज सकाळी पाणी आल्यानंतर नम्रताने पाणी भरण्यासाठी विद्युत मोटर सुरू केली. नम्रता नळावरून पाणी भरत होती. याचदरम्यान तिचा तिथे पडलेल्या इलेक्ट्रिक […]

अधिक वाचा...

अहमदनगर जिल्ह्यात कत्तलीसाठी डांबली जनावरे अन् पोलिसांवर जीवघेणा हल्ला…

अहमदनगर: कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे डांबून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर ती सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जेवघेणा हल्ला झाला आहे. या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून, पोलिसांच्या वाहनाचे देखील मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. श्रीगोंदा परिसरात कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे डांबून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली […]

अधिक वाचा...

‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे राज्यभर आंदोलन…

पत्रकारांच्या प्रश्नांसाठी सरकार आणि प्रशासन यांना विचारणार जाब मुंबई : राज्य सरकार आणि राज्याचे माहिती महासंचालनालय विभाग यांच्या माध्यमातून पत्रकारांच्या अनेक मागण्यांसाठी सोमवारी (ता. २८) राज्यभरात साडेचारशे ठिकाणी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक जयश्री भोज यांना भेटून निवेदन देत […]

अधिक वाचा...

धक्कादायक! महाराष्ट्रात युवकाला झाडाला बांधून अमानुषपणे मारहाण…

अहमदनगर: शेळी चोरी केल्याच्या संशयावरून युवकाला झाडाला बांधून अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना हरेगाव (ता. श्रीरामपूर) घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, जखमी युवकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हरेगाव येथील नाना गलांडे यांची काही दिवसापूर्वी शेळी आणी काही कबुतर चोरीला गेले होते. या चोरीच्या संशयावरून शुक्रवारी (ता. २५) सकाळी चार युवकांना त्यांच्या […]

अधिक वाचा...

माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना जामीन मंजूर…

मुंबईः व्यापारी मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि अँटिलिया बॉम्ब प्रकरणी अटकेत असलेले माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने आज (बुधवार) जामीन मंजूर केला आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने प्रदीप शर्मा यांना जामीन नाकारला होता. त्यानंतर शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना दिलासा देत […]

अधिक वाचा...

युवकांच्या त्रासाला कंटाळून मुलीने घेतला जगाचा निरोप; चिठ्ठीत म्हटले की…

नाशिक: सिन्नर तालुक्यातील शहा येथील दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी (ता. 22) मध्यरात्री उघडकीस आला आहे. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत गावातील तीन युवकांकडून त्रास होत असल्याचे नमूद केले होते. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. वैष्णवी नवनाथ जाधव (16) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!