
धक्कादायक! प्रेम प्रकरणातून युवकाला जखमी अवस्थेतच फेकले विहिरीत अन्…
औरंगाबादः प्रेमाच्या संशयावरुन युवतीच्या घरच्यांनी गावातील एका बेदम मारहाण करून जखमी झाल्यावर जिवंत असतानाच विहिरीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना खातखेडाच्या बामणवाडी (ता. कन्नड) येथे घडली आहे. जखमी युवकाला पोहता येत नसल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. नारायण रतन पवार (वय 22, रा. खातखेडा, कन्नड) असे हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. पिशोर पोलिसांत 17 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, 8 आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नारायण पवार याच्या घरासमोरच आरोपींचे कुटुंब राहते. रविवारी (ता. 6 )सायंकाळी काकुळते कुटुंबातील एक लहान मुलगा नारायणच्या घरासमोर आला आणि दरवाजात एक चिठ्ठी फेकून निघून गेला होता. त्या मुलाने फेकलेली चिठ्ठी नारायणने उचलली. त्यावेळी घरात त्याचे आई-वडीलही बसलेले होते. काय आहे चिठ्ठीत? असे त्यांनी विचारल्यानंतर त्याने चिठ्ठी वाचायला सुरुवात केली. चिठ्ठीतील मजकूर वाचून सर्वांना धक्का बसला. ते प्रेमपत्र होते. काकुळते यांच्या घरातील एका युवतीने ते नारायणला पाठवले होते. त्यामुळे नारायणच्या कुटुंबातील सदस्यांनी संबंधित मुलीच्या घरच्यांना याबाबत माहिती दिली. मात्र, मुलीने आपण चिठ्ठी पाठवलीच नसल्याचे सांगितल्याने यावरून दोन्ही कुटुंबात वाद झाला. पण तो मिटला सुद्धा होता.
दरम्यान, वाद मिटल्यावर सोमवारी सायंकाळी नारायण आणि त्याचे आई-वडील, भाऊ, बहीण हे घरात बसलेले असताना, अचानक कुणी तरी दरवाजाची कडी वाजवली. दरवाजा उघडताच समोर प्रवीण नारायण काकुळते हातात काठी घेऊन उभा होता. त्याने नारायणला शिवीगाळ करत घरातून बाहेर ओढले. बाहेत त्या मुलीचे अख्खे कुटुंब हातात लाठ्याकाठ्या घेऊन उभे होते. नारायणला बाहेर ओढताच त्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला. त्याला दगड, काठ्यांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. नारायण याच्या घरच्यांनी आरोपींच्या तावडीतून त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींची संख्या जास्त असल्याने तो असफल ठरला. तसेच, त्यानंतर जखमी नारायणला विहिरीत फेकून दिल्याचा आरोप त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी केला आहे.
दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तर घटनेची माहिती मिळताच पिशोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तसेच, रात्री उशिरा गावकऱ्यांच्या मदतीने नारायणचे प्रेत विहिरीबाहेर काढण्यात आले. पोलिसांनी एकूण 17 लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, 11 जणांना अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
प्रेम! पुन्हा तुझ्या आयुष्यात येणार नाही म्हणून मारली नदीत उडी…
लॉकडाऊनमधील प्रेमसंबंधाचा तिहेरी खुनाने झाला शेवट अन्…
येरवडामधील जेल कर्मचाऱ्याची प्रेमसंबंधातून आत्महत्या; गुन्हा दाखल…
माता न तू वैरिणी! अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा म्हणून चिमुकल्याचा खून…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…