जिस दिन मारुंगा छाती पे मारुंगा, या स्टेटसनंतर शरीराची अक्षरशः चाळण…

जळगाव: पाचोरा शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात शुक्रवारी (ता. ४) मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञातांनी युवकावर गावठी कट्ट्याने तब्बल १२ राउंड फायर करत निर्घृण हत्या केली. वाळू व्यवसायाशी संबंधित वादातून ही धक्कादायक घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृत युवकाचे नाव आकाश कैलास मोरे (वय २६, रा. छत्रपती शिवाजी नगर, पाचोरा) असे आहे. मृताच्या शरीरावर इतक्या गोळ्या घालण्यात […]

अधिक वाचा...

जळगाव! गायत्री पाटील प्रकरणाला मिळालं नवं वळण…

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील गायत्री पाटील प्रकरणाने खळबळ उडाली होती. नोकरीचं आमिष दाखवून अपहरण, दोन लाखांत विक्री, आणि बळजबरीने विवाह केला अशा आरोपांनी सुरू झालेल्या या कथेला आता तपासात नवं वळण मिळालं आहे. पोलिसांनी परभणी येथून गायत्रीला ताब्यात घेतलं असून, ती फसवणूक करणाऱ्या बनावट विवाह रॅकेटचा भाग असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जळगावमधील युवतीची […]

अधिक वाचा...

धक्कादायक! मुलीची विक्री अन् नरकयातना समजताच वडिलांची आत्महत्या…

जळगाव: एका अल्पवयीन मुलीला काम देण्याच्या बहाण्याने तिची विक्री केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने कोल्हापुरात एका व्यक्तीसोबत लग्न लावून तिचे लैंगिक शोषण केले. युवती गर्भवती राहिल्यानंतर आरोपींनी तिचा गर्भपात केला. हा सगळा प्रकार पीडितेच्या वडिलांना समजल्यानंतर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भैया रामदास पाटील (वय ४१) असे आत्महत्या केलेल्या […]

अधिक वाचा...

जळगाव! शिक्षकाने शाळेतील वर्गातच घेतला गळफास…

जळगाव: शिक्षकाने शाळेतच गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पाचोरा येथे उघडकीस आली आहे. सुपडू भादु विद्या मंदिर शाळेतील ही घटना असून रवींद्र महाले असे आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. शिक्षक रवींद्र महाले यांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप अस्पष्ट नाही. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुपडू भादु विद्या मंदिर शाळेच्या मधल्या […]

अधिक वाचा...

जळगाव! विवाहित महिलेच्या मृत्यू प्रकरणात आला नवीन ट्विस्ट…

जळगाव: जळगाव तालुक्यातील किनोद येथे एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी समोर आली होती. मात्र या प्रकरणात आता नवीन ट्विस्ट आला आहे. ही आत्महत्या नसून विवाहितेची सासू आणि नणंद यांनी गळा आवळून खून केल्याचा आरोप विवाहितेच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत. गायत्री ज्ञानेश्वर कोळी (वय २६) असे मृत […]

अधिक वाचा...

महाराष्ट्रातील जवानाचा हृदयविकाराच्या धक्क्याने अरूणाचलमध्ये मृत्यू…

जळगाव: अरुणाचल प्रदेशात नियंत्रण रेषेवर कार्यरत असलेल्या महाराष्ट्राच्या जवानाचा मृत्यू झाला आहे. अर्जुन लक्ष्मण बावस्कर (वय ३५, रा. वरणगाव, ता. भुसावळ, जि. जळगाव) असे हुतात्मा झालेल्या जवानाचे नाव आहे. भारतीय सेनेतील जवान दहा युनिट महार रेजिमेंटमध्ये नायक पदावर कार्यरत होते. अरुणाचल प्रदेश याठिकाणी 24 मार्च रोजी रात्रीची गस्त घालण्याचे कर्तव्य बजावत असताना दुपारी दीडच्या सुमारास […]

अधिक वाचा...

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची टवाळखोरांनी काढली छेड…

जळगाव : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची काही टवाळखोरांनी छेड काढली आहे. मुक्ताईनगरच्या यात्रा महोत्सवात रक्षा खडसे यांची मुलगी मैत्रिणींसोबत गेली होती. यावेळी काही टवाळखोरांनी तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला. तिच्या मनाविरोधात तिचे फोटो, व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीचीच छेडछाड झाल्याने खरंच महाराष्ट्रात मुली सुरक्षित आहेत का? असा प्रश्न विचारला जात आहे. […]

अधिक वाचा...

रील स्टार मुलाचा माजी सैनिक असलेल्या बापाने केला खून अन्…

जळगाव : रील स्टार म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या मुलगा दारु पिऊन सातत्याने कुटुंबियांना मारहाण करत असल्यामुळे त्रासलेल्या माजी सैनिक असलेल्या बापाने आणि त्याच्या भावाने मिळून त्याची गळा दाबून हत्या केली. रील स्टार विकी पाटील याच्या हत्येनंतर त्याचे वडील विठ्ठल पाटील यांनीही गळफास घेऊन आत्महत्या केल्याने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे […]

अधिक वाचा...

अजित पवार यांनी जळगाव रेल्वे घटनेबाबत दिली संपूर्ण माहिती; 13 मृत्युमुखी…

पुणे: मुंबईकडे जाणाऱ्या ‘पुष्पक’ एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्यांसाठी आगीची अफवा अनेकांसाठी जीवघेणी ठरली आहे. सामान्य श्रेणीतील प्रवाशांनी स्वतःचा जीव वाचविण्यासाठी दोन्ही बाजूंनी बाहेर उड्या घेतल्या आणि जीव वाचवण्यासाठी बाहेर गेले असताना तिथेच घात झाला. मुंबईकडून जळगाव स्थानकाकडे भरधाव वेगात येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने अनेकांना चिरडले. या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. […]

अधिक वाचा...

जळगाव रेल्वे अपघातात ११ जणांचा मृत्यू; केवळ अफवा ठरले कारण…

जळगाव: जळगावच्या परधाडे स्थानकाजवळ अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. चालत्या रेल्वेत आग लागल्याची अफवा पसरल्याने काही प्रवाशांनी थेट ट्रेनमधून उड्या मारल्या आहेत. यात काही प्रवासी समोरून येणार्‍या रेल्वेखाली चिरडले गेले आहेत. आतापर्यंत ११ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. परधाडे स्थानकाजवळ आज (बुधवार) साडेचारच्या सुमारास ही घटना घडली आहे. पुष्कप एक्स्प्रेस मुंबईला चालली […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!