मतदानाला अवघे काही तास शिल्लक असतानाच मिळालं मोठं घबाड…
हिंगोली : राज्यात निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून उद्या 2 डिसेंबर रोजी राज्यातील जवळपास अडीचशेपेक्षा जास्त नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मतदान होत आहे. हिंगोली शहरात एका बॅगमध्ये मोठी रोकड सापडल्याने खळबळ उडाली आहे. 100,200,500 अन् 50 रुपयांच्या नोटांचे बंडल पांढऱ्या रंगाच्या बॅगमध्ये आढळून आले आहेत. हिंगोली शहरांतील शेतकरी भवन परिसरामध्ये हिंगोली पोलिसांच्या पथकाने चार चाकी गाडीमधून एक […]
अधिक वाचा...नाशिक! एकाच कुटुंबातील 4 जणांचे मृतदेह सापडले; मृतांमध्ये दोन चिमुकले…
नाशिक: नाशिक जिल्ह्याच्या देवळा तालुक्यातील फुले माळीवाडा येथे आज (रविवार) सकाळी एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह घरात आढळून आले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये पती, पत्नी आणि त्यांच्या दोन्ही अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. या घटनेमागील कारण अद्याप अस्पष्ट असून, प्राथमिक पाहण्यात ही घटना आत्महत्येची असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मृतांमध्ये गोविंद […]
अधिक वाचा...नाशिक हादरलं! प्रेयसीसोबतचे अश्लील फोटो नवविवाहितेला दाखवले अन्…
नाशिक : नाशिकमध्ये नवविवाहित महिलेने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नेहा संतोष पवार (वय २७, रा. हिरावाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. विवाहितेच्या सुसाईड नोटवरून नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पतीसह सासू आणि नणंदेकडून वारंवार चारित्र्यावर संशय घेत मानसिक त्रास दिला जात […]
अधिक वाचा...तोतया IAS महिलेच्या फोनमध्ये खळबळजनक खुलासे…
छत्रपती संभाजीनगर: एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये एक महिला मागील सहा महिन्यांपासून राहत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. संबंधित महिलेचं पाकिस्तानी आणि अफगाणिस्तान कनेक्शन समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. शिवाय, तिच्या घरात तब्बल १९ कोटी रुपयांचा चेकही सापडला आहे. त्यामुळे ही महिला राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे तपास यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे. कल्पना त्र्यंबकराव भागवत असे […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! नवरदेवाने घातला नवरीला हार अन् आला हृदयविकाराचा झटका…
अमरावती: अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील पुसला या गावात लग्नसोहळ्यात घडलेल्या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. आनंदाच्या वातावरणात सुरू झालेला विवाहसोहळा क्षणभरात शोकांतिका ठरला. कोतवाल म्हणून शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अमोल गोड यांच्या विवाहाची लगबग गावात सुरू होती. घरात सनई–चौघडे गुंजत होते, नवरी वधूवस्त्रात सजून बसली होती आणि नवरदेव अमोल यांची वरातही आनंदात कार्यालयाच्या […]
अधिक वाचा...गौरी पालवे-गर्जे यांना सापडलेल्या कागदपत्रातून धक्कादायक खुलासा…
मुंबईः राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक (पीए) अनंत गर्जे यांच्या डॉक्टर पत्नी गौरी पालवे-गर्जे (वय 28) यांनी शनिवारी (ता. २२) संध्याकाळी वरळीच्या आदर्श नगर येथील ‘महाराष्ट्र मल्टी युनिट रेसिडेन्शियल सोसायटी’मधील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अवघ्या 10 महिन्यांपूर्वीच अनंत गर्जे आणि गौरी पालवे यांचा थाटामाटात विवाह झाला होता. मात्र, त्यानंतर अनंत गर्जे […]
अधिक वाचा...पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या डॉक्टर पत्नीची आत्महत्या…
मुंबई: भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने राहत्या घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे. एका राजकीय नेत्याच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीने अशाप्रकारे आयुष्याचा शेवट केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अनंत गर्जे यांच्या पत्नीचं नाव गौरी असून त्या डॉक्टर होत्या. ८ ते ९ […]
अधिक वाचा...सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू…
धाराशिव: सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर धाराशिव येथे आज (शनिवार) गाडीचे टायर्स फुटल्याने झालेल्या भीषण अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आठ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, क्रुझर गाडी सोलापूर-हैदराबाद महामार्गावरुन आज सकाळी जात होती. या गाडीतील प्रवासी सोलापूरवरुन नळदुर्ग येथे देवदर्शनासाठी निघाले होते. धाराशिवमधील अणदूर परिसरात […]
अधिक वाचा...पुणे! नवीन थारने कोकणात जाताना अपघातात सहा मित्रांचा मृत्यू; पाहा नावे…
पुणे : कोकणात जाताना ताम्हिणी घाटात थार कारचा भीषण अपघात झाला असून, सहा युवकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. मंगळवारी (ता. १८) रात्री हा अपघात झाला असून नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केल्यानंतर आज (गुरुवार) ही घटना उघडकीस आली. दरम्यान, 20 दिवसांपूर्वीच घेतलेली नवीन थार कार घेऊन हे […]
अधिक वाचा...सांगलीच्या विद्यार्थ्याची दिल्लीत आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये म्हणाला…
नवी दिल्ली: दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्या आणि शिक्षिकांच्या जाचाला कंटाळून दहावीमधील विद्यार्थ्याने मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून खाली रस्त्यावर उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शौर्य प्रदीप पाटील (रा. राजीवनगर, नवी दिल्ली) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. शौर्य प्रदीप पाटील हा मूळचा सांगली जिह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वरचा रहिवासी आहे. त्याचे वडील प्रदीप पाटील […]
अधिक वाचा...
