बीड हादरलं! सरपंचाने केलेल्या बेदम मारहाणीत महिला वकिलाचे अंग पडले काळे-निळे…

बीड: बीड जिल्हा हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. घरापुढे होत असलेल्या ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारीनंतर वकील महिलेला बेदम मारहाण झाल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यात घडली आहे. सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्याकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि पाईपने जबर मारहाण करण्यात आली आहे. यात पाईपच्या माराने अंग काळनिळं पडले आहे. किरकोळ वादातून उफाळून आलेल्या या अमानुष मारहाणीचा प्रकार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट केल्यानंतर समोर आला आहे.

बीड जिल्ह्यात घटलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टनंतर मारहाणीचा प्रकार समोर आला आहे. घटनेतील पडीत महिलेने ध्वनी प्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्याने घरापुढील लाऊडस्पिकर, पिठाच्या गिरण्या काढाव्यात याबाबत कार्यालयीन तक्रारी दिल्या होत्या. यानंतर या वकील महिलेला अमानुष मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीनंतर ही महिला बेशुद्ध पडली होती. त्यानंतर तिला उपचारानंतर घरी पाठवल्याचे या पोस्ट मध्ये म्हटले आहे. या मारहाणीनंतरचे फोटो व्हायरल झाले आहेत.

अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकीली करणार्‍या महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्याकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि जे.सी.बी पाईपने जबर मारहाण केली. महिला बेशुद्ध पडल्यानंतर दवाखान्यातुन ही एका रात्रीत उपचार करून घरी पाठवले आहे. सरपंच आणि इतर दहा पुरूषांनी मिळून एका वकील असलेल्या महिलेला मारहाण केल्यानंतर खळबळ उडाली आहे. गावात सरपंचाचा कारभार कसा असेल, कोणत्या पक्षाचा हा सरपंच आहे? असा संतप्त सवाल जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करत विचारला आहे.

https://x.com/Awhadspeaks/status/1912915876099313890

अंबाजोगाईतील सनगाव येथील ज्ञानेश्वरी अंजान हिला मायग्रेन आणि पाठीच्या दुखण्याचा त्रास असल्याने तिला बोलतानाही प्रचंड त्रास जाणवत होता. तिने सांगितले की,तिने सांगितले की, 23 फेब्रुवारी 2023 रोजी गावातील एका मंदिराच्या भोंग्याचा आवाज तीव्र होता. मी त्यावेळी अभ्यास करत होते. जास्त आवाजामुळे माझं अभ्यासात लक्ष लागत नव्हते. मी त्यावेळी सरपंच अनंत अंजान यांना फोन करुन भोंग्याचा आवाज कमी करायला सांगितला. त्यांनी मी कर्मचाऱ्याला आवाज कमी करायला सांगतो, असे सांगितले. मात्र, दोन तास उलटूनही काही झाले नाही. मी पुन्हा फोन केला तेव्हा कर्मचारी माझा कॉल उचलत नसल्याचे सरपंचांनी सांगितले. त्यामुळे मी संबंधित कर्मचाऱ्याच्या घरी जाऊन देवळातील भोंग्याचा आवाज कमी करायला सांगितले. तेव्हा मी नॉनव्हेज खाल्ल्याने मंदिरात जाऊ शकत नाही, असे त्याने म्हटले. त्यामुळे मी पुन्हा सरपंचांना कॉल केला तेव्हा त्यांनी पोलिसांत तक्रार करायला सांगितले. मी तरीही आधी ग्रामविकास अधिकाऱ्याला फोन केला. तो बोलला मी उद्या आल्यावर आवाज कमी करतो. त्यावर मी बोलले की, आवाज सकाळपर्यंत सुरु राहिला तर मी काय करु? मला त्रास होत असल्याने आवाज सहन होत नव्हता. त्यामुळे मी पोलीस ठाण्यात फोन करुन तक्रार केली. पोलिसांनी त्यामध्ये हस्तक्षेप करुन आवाज कमी केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सरपंच त्याच्या लोकांना घेऊन माझ्या घरी आला. माझ्या आई-वडिलांवर दबाव टाकला. तुम्हाला धार्मिक कार्यक्रम करुन द्यायचे आहेत की नाही, असे त्याने विचारले. या प्रकारानंतर सरपंचाने मुद्दाम पिठाच्या तीन गिरण्या आमच्या घराच्या बाजूला सुरु केल्या. या सततच्या आवाजाने मला गंभीर प्रकारचा मायग्रेन झाला. मला पाठदुखीची समस्याही जडली, असा आरोप ज्ञानेश्वरी अंजान यांनी केला.

वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरबाबत दावा करणारे PSI रणजीत कासले ताब्यात…

बीड! अल्पवयीन मुलाला उचलून आदळलं, जागेवरच मृत्यू…

बीडमधील गँगला सुतासारखं सरळ करणार: अजित पवार

बीड पुन्हा हादरलं! प्रेमसंबंधातून युवकावर कोयत्याने सपासप वार…

बीड हादरलं! संतोष देशमुखांनी भावाच्या हत्येचा बदला घेतला, त्याच ठिकाणी संपवलं…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!