जवान मुरली नाईक हुतात्मा! आई, माझं पहिलं कर्तव्य, मला सीमेवर जायलाच हवं…

मुंबई : भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान मुंबईतील जवान मुरली नाईक हे हुतात्मा झाले आहेत. उरी सेक्टरमध्ये लढताना नाईक यांना वीरमरण आले आहे. हुतात्मा मुरली नाईक यांनी उरीला जाण्यापूर्वी कुटुंबीयांना एक कॉल केला. आईने मुरली नाईक यांना थांबविण्याचा प्रयत्नही केला. मात्र, “देशाला माझी गरज आहे. ते माझं कर्तव्य आहे. मला जायलाच हवं. मी व्यवस्थित परत येईन,” असे म्हणून […]

अधिक वाचा...

लग्न झालेल्या जवानाला सीमेवरून बोलावणं! ‘ऑपरेशन सिंदूर’साठी माझं कुंकू पाठवतेय…

जळगाव: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांचा जीव घेतला. याचाच बदला भारताना पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करून घेतला. भारत-पाकिस्तान सीमेवर सध्या दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू आहे. जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून, त्यांना हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी सुट्टी रद्द झाल्याने नवरवर देशासाठी बॉर्डवर हजर झाला. त्यानंतर नववधूने ‘ऑपरेशन सिंदूर’साठी माझं कुंकू पाठवतेय, […]

अधिक वाचा...

सर्वोच्च बलिदानाला सलाम! पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान हुतात्मा…

श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानी सैन्याने बुधवारी (ता. ७) पहाटे केलेल्या गोळीबारात ५व्या फील्ड रेजिमेंटचे लान्स नाईक दिनेश कुमार शर्मा हुतात्मा झाले आहेत. हुतात्मा झालेल्या भारतीय जवानाच्या सर्वोच्च बलिदानाची व्हाईट नाईट कॉर्प्सने बुधवारी रात्री अधिकृत माहिती दिली. पाकिस्तानी सैन्याने पूंछ, तंगधार आणि इतर सीमावर्ती नागरी भागात रात्री गोळीबार सुरू केला. भारताने सुद्धा […]

अधिक वाचा...

Operation Sindoor: कोण आहेत लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी…

नवी दिल्ली: पाकिस्तानी दहशतवादी छावण्यांवर भारतीय हवाई हल्ल्याच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी सहभागी झाल्या होत्या. पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी या चर्चेत आल्या आहेत. सोफिया कुरेशी या गुजरातच्या रहिवासी आहेत. त्यांचा जन्म 1981 मध्ये गुजरातमधील वडोदरा येथे झाला. त्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये पोस्ट ग्रेज्युएशन केले आहे. सोफिया यांचे आजोबा देखील भारतीय सैन्यात होते. […]

अधिक वाचा...

‘Operation Sindoor’ मोहिम नरेंद्र मोदी नव्हे तर कोणी राबवली पाहा…

नवी दिल्ली: भारतीय लष्कराने बुधवारी (ता. ७) रात्री जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. भारताने पाकिस्तानमधील नऊ ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. पाकिस्तानविरुद्धच्या या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले. हल्ल्याची वेळ ७ मे २०२५ रोजी रात्री १२:३७ वाजता निश्चित करण्यात आली होती. भारताने ९ ठिकाणांवर एकूण २४ क्षेपणास्त्र डागली आहेत. […]

अधिक वाचा...

महाराष्ट्रातील जवानाचा हृदयविकाराच्या धक्क्याने अरूणाचलमध्ये मृत्यू…

जळगाव: अरुणाचल प्रदेशात नियंत्रण रेषेवर कार्यरत असलेल्या महाराष्ट्राच्या जवानाचा मृत्यू झाला आहे. अर्जुन लक्ष्मण बावस्कर (वय ३५, रा. वरणगाव, ता. भुसावळ, जि. जळगाव) असे हुतात्मा झालेल्या जवानाचे नाव आहे. भारतीय सेनेतील जवान दहा युनिट महार रेजिमेंटमध्ये नायक पदावर कार्यरत होते. अरुणाचल प्रदेश याठिकाणी 24 मार्च रोजी रात्रीची गस्त घालण्याचे कर्तव्य बजावत असताना दुपारी दीडच्या सुमारास […]

अधिक वाचा...

महाराष्ट्राच्या जवानाला वीरमरण; वाहन कोसळले ८०० फूट खोल दरीत…

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ मलकापूर येथील जवान सुनिल विठ्ठल गुजर (वय २७) यांना वीरमरण आले आहे. 2019 साली सुनिल विठ्ठल गुजर हे भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. सुनिल गुजर यांच्या मागे आई, वडील, पत्नी आणि सहा महिन्यांचा मुलगा तसेच भाऊ असा परिवार आहे. सुनिल गुजर यांनी पुण्यातील बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये […]

अधिक वाचा...

आरोपी दत्ता गाडे याला पकडण्याचे श्रेय घेण्यासाठी सगळेच पुढे; पण खरं पकडलं कोणी पाहा…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये युवतीवर (वय २६) झालेल्या बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे (रा. गुनाट ता. शिरूर ) याला पकडण्यात गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांमुळे स्वारगेट पोलिसांना अखेर यश मिळाले. स्वारगेट पोलिसांबरोबरच पुणे ग्रामीण गुन्हे शोध पथकाचे पोलिस आरोपी दत्तात्रय गाडे याचा कसून शोध घेत होते. आरोपी […]

अधिक वाचा...

Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)

स्वातंत्र्योत्तर काळापासून भारताची पश्‍चिम सीमा कायमच तणावाखाली असते. जवळजवळ रोजच या सीमेवर पाकिस्तानी रेंजर्स गोळीबार आणि उखळी तोफांचा भडीमार करत असतात. अर्थात भारताकडूनही त्यांच्या या आगळीकीला चोख प्रत्युत्तर देण्यात येतं. पाकिस्तानातल्या वेगवेगळ्या जहालमतवादी संघटनांचे दहशतवादी मिळेल त्या मार्गानं घातपात करण्याच्या उद्देशानं भारतात लपतछपत घुसखोरी करत असतात. भारतीय लष्कराची ही कायमची डोकेदुखी बनली आहे. तथापि, ही […]

अधिक वाचा...

जवान चंदू चव्हाण यांचे आमरण उपोषण; पाहा प्रमुख मागण्या…

धुळे : पाकिस्तानातून भारतात परतलेले आणि भारतीय लष्करातून बडतर्फ केलेले जवान चंदू चव्हाण यांनी आजपासून (मंगळवार) धुळे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (जेल रोड) आमरण उपोषण सुरू केले आहे. चंदू चव्हाण म्हणाले, ‘लष्कराची ११ वर्षे सेवा केल्यानंतर मला बडतर्फ करण्यात आले. मला कुठल्याही प्रकारची पेन्शन लागू करण्यात आलेली नाही. त्यामुळे माझ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. न्यायाची भीक […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!