
महाराष्ट्र हादरला! सख्या भावांसह तिघांचा एका रात्रीत खून…
जळगाव : भुसावळ शहरात एकाच रात्रीत दोन सख्ख्या भावांसह एका कुख्यात गुन्हेगाराचा खून झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. तिहेरी हत्याकांडाने शहर हादरले आहे. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दोन भावांची धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली. यानंतर काही तासाताच कुख्यात गुन्हेगाराचीही हत्या झाली.
शुक्रवारी (ता. १) रात्री 11 वाजेच्या सुमारास कंडारी परिसरात शांताराम भोलानाथ साळुंखे (वय ३३) व राकेश भोलानाथ साळुंखे (वय २८) या दोन सख्ख्या भावांवर अज्ञातांनी चाकूने व तलवारीने वार केले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर काही तासाच्या आतच श्रीराम नगर परिसरात कुविख्यात गुन्हेगार निखिल राजपूत याच्यावर अज्ञातांनी वार केले. निखिल राजपूत याच्या गळ्यावर वार करत त्याची हत्या करण्यात आली. या तिहेरी हत्याकांडाने भुसावळ शहर हादरले आहे. भुसावळ शहर पोलिस व बाजारपेठ पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.
क्रूरता! कुत्र्याला बेदम मारहाण करत दिली फाशी…
घराचा दरवाजा उघडताच मुलाची अवस्था पाहून आईने फोडला हंबरडा…
पिता-पुत्राच्या संशयास्पद मृत्यूनंतर धक्कादायक माहिती आली पुढे…
डॉ. आदिनाथ पाटीलने स्वतःला इंजेक्शन घेऊन घेतला जगाचा निरोप…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…