झारखंड व पश्चिम बंगाल बॉर्डरवरील गंगा नदीतील बेटावरून अपहृत व्यक्तीची पोलिसांनी केली सुखरुप सुटका…

पुणे (सुनिल सांबारे): एक कोटी रुपयाच्या खंडणीसाठी एकाचे अपहरण करुन त्यास झारखंड व पश्चिम बंगाल बॉर्डरवरील गंगा नदीतील बेटावर डांबून ठेवले होते. खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथक गुन्हे शाखेने अपहृत व्यक्तीची सुखरुप सुटका करुन, ०३ आरोपींना अटक केली आहे.

दिनांक १८/१०/२०२४ रोजी अपहृत व्यक्तीचा मुलगा प्रभारी अधिकारी, खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथक यांना भेटून माहिती दिली की, त्यांचे वडील दिनांक १७/१०/२०२४ रोजी पासून घरी नसून, त्यांना त्यांचे वडीलांचे मोबाईल फोनवरुन, ०१ कोटी रुपयेची खंडणीची मागणी केली तसेच पैसे न दिल्यास तसेच पोलिसांकडे गेल्यास तक्रारदारांचे वडीलांना जीवे ठार मारु अशी धमकी दिली. तक्रारदाराने असे सांगितल्याने, प्रभारी अधिकारी, खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथक यांनी सदर प्रकाराबाबत गांभीर्य ओळखून, वरीष्ठांना माहिती कळवून, तक्रारदार यांची तात्काळ तक्रार घेवून, त्याबाबत हिंजवडी पोलिस ठाणे गु. रजि नं. ११८५/२०२४ भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम १४० (२), १४२, ३०८ (३), ३०८ (४), ३०८ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखून पोलिस आयुक्त व सह पोलिस आयुक्त यांचे नेतृत्वाखाली अप्पर पोलिस आयुक्त वंसत परदेशी, पोलिस उप-आयुक्त गुन्हे, संदिप डोईफाडे, सहायक पोलिस आयुक्त गुन्हे ०१ डॉ. विशाल हिरे, वपोनि खंडणी विरोधी पथक देवेंद्र चव्हाण, वपोनि युनीट ०४ संदिप सावंत यांच्या टिम तयार करुन, अपहरण झालेल्या व्यक्तीची सुखरुप सुटका करुन, आरोपीतांना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले.

दाखल गुन्हयाचे अनुषंगाने तपास करीत असतांना अपहरण झालेल्यास नारळ पाणी विक्रेता याने विमानाने कोलकत्ता, (पश्चिम बंगाल ) येथे घेवून गेल्याचे तपासात निष्पन्न झाले. पुणे विमानतळावरील कोलकत्त्याला जाणाऱ्या विमानातील प्रवाशांची माहिती घेवून, सीसीटीव्ही कॅमेरे चेक करुन संशयीतांची माहिती प्राप्त करुन प्राप्त मोबाईल नंबरचे पोहवा सुनिल कानगुडे व नागेश माळी यांनी तांत्रिक विश्लेषण करुन, इतर संशयीत इसमांचे मोबाईल नंबर प्राप्त केले. त्या दरम्यान गुन्हे शाखेकडील पोउपनिरी सुनिल भदाणे, अशोक जगताप व पोलिस अमंलदार प्रदीप गोडांबे, मंगेश जाधव व रामदास मोहिते यांना अपहृत इसमाचा व आरोपींचा शोध घेणेकरीता झारखंड व पश्चिम बंगाल राज्यात रवाना करण्यात आले.

दरम्यान अपहृत व्यक्तीच्या मुलास आरोपी हे त्यांच्या वडीलांच्या फोनवरुन, ०१ कोटी लवकर जमा कर, पोलिसाकडे गेल्यास अगर काही गडबड केल्यास तुझ्या वडीलांना ठार मारुन टाकू, अशी धमकी देवून, रात्री १० पर्यंत पैसे जमा कर. त्यानंतर कोठे यायचे ते सांगतो असे सांगून, फोन बंद करत होते. त्यानंतर पुन्हा सांयकाळी ०७/३० वाजता आरोपीतांनी फोन करुन, पैसे किती जमा झाले. अर्धा तासात पुणे रेल्वे स्टेशन येथे घेवून ये. असे कळवून फोन बंद केला. अपहृत इसमाचे मुलास खंडणीच्या पैशाकरीता फोन येत असल्याने, पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी पोलिस अधिक्षक, मालदा, (पश्चिम बंगाल) व साहीबगंज (झारखंड) यांचेशी संपर्क करुन दाखल गुन्हयाबाबत माहिती देवून, तपासात मदत करण्याबाबत कळविले. त्यानंतर गुन्हेशाखेकडील पथक तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी, राजमहल, (झारखंड) यांचे पथकाने रात्रीच्या अंधरात आरोपींचा पालचगाची प्राणपूर, बनुटोला आणि गोल ढाब खोऱ्यात गंगा नदीतून बोटीतून आणि चिखलातून पायी प्रवास करुन पथकाने आरोपींचा माग काढत, गंगा नदी पात्रात गोलढाब बेटावर छापा कारवाई करुन पहाटे ०५.०० वाचे सुमारास अपहृत इसमाची सुखरुप सुटका केली.

आरोपी
१) नसीम मनीरुल हक अख्तर वय २० वर्षे रा. धरमपूर, तीनमुहानी, ठाणे-मुथाबाडी जिल्हा- मालदा राज्य पश्चिम बंगाल
२) लल्लू रुस्तम शेख वय ४५ वर्षे रा. अमानत दियारा, ठाणे – राधानगर, जिल्हा – साहेबगंज राज्य झारखंड यांना ५०,०००/- रु किंच्या ०३ मोबाईलसह ताब्यात घेवून, अटक केली. ०३ आरोपी गंगा नदीत उडी मारुन पळून जाण्यास यशस्वी झाले. तसेच आरोपीतांचा एक साथीदार हा कल्याण ठाणे येथे असलेबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने गुन्हेशाखेकडील सपोफौ रमेश गायकवाड, पोलिस अंमलदार गावांडे व राणे यांना कल्याण ठाणे येथे रवाना करुन, आरोपी साजीम करिम बबलू शेख, वय २० वर्षे, छक्कुटोळा, ता. मोथाळवाडी, जि. मालदा राज्य- पश्चिम बंगाल यास २०,०००/- किंच्या ०२ मोबाईल फोनसह ताब्यात घेतले. तसेच इतर
तीन आरोपींचे नाव निष्पन्न करण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास हिंजवडी पोलिस ठाणे करीत आहे.

पोलिस आयुक्त अपर पोलिस आयुक्त, पोलिस उप-आयुक्त, गुन्हेशाखा व सहा. पोलिस आयुक्त गुन्हे – १ तसेच संपुर्ण टिम यांनी अहोरात्र जागून, झारखंड येथील पोलिसांशी समन्वय साधून तांत्रिक मदत करुन, आरोपी ताब्यात घेतले व अपहृत झालेला व्यक्तीची सुखरुप सुटका केली.

सदरची कारवाई पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलिस आयुक्त, डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उप-आयुक्त, गुन्हे संदिप डोईफोडे, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हे- १ डॉ. विशाल हिरे सहा. पोलिस आयुक्त, गुन्हे-२ बाळासाहेब कोपनर यांचे मार्गदर्शनाखाली, खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण युनिट ४ चे वपोनि संदीप सावंत, खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाचे पोउपनि सुनिल भदाणे, सपोफौ रमेश गायकवाड, पोलिस अंमलदार सुनिल कानगुडे, किरण काटकर, प्रदीप गोडांबे, किशोर कांबळे, मंगेश जाधव आशिष बोटके भुपेंद्र चौधरी तसेच गुंडा विरोधी पथकाचे पोउपनिरी अशोक जगताप, रामदास मोहिते व युनिट- ४ कडील पोलिस अंमलदार प्रशांत सैद, सुखदेव गावांडे व अमर राणे तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोअंम, नागेश माळी व पोपट हुलगे यांचे पथकाने केली आहे.

पुण्यातील घरमालकाचे एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या तिघांना बंगालमध्ये अटक

गोव्याला फिरण्यासाठी निघालेल्या पोलिसांनी केला युवतीच्या अपहरणाचा प्रयत्न…

पोलिसांनी अपहरण कर्त्यांचा पाठलाग करून विद्यार्थ्याची केली सुटका…

पुणे शहरात शिक्षणासाठी आलेल्या लातुरच्या युवतीचे अपहरण करून खून…

Video: पुणे पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन जीवावर उदार होत अपहरण कर्त्यांची केली सुटका…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!